शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

यावल तालुक्यातील साकळी येथे विहीर पुनर्भरणाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:38 IST

गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देदोघा भावांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी केले सहकार्यशासनाच्या मदतीविना राबविला उपक्रम

सुधीर चौधरीचुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील पिपºया कॉलनी भागातील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.साकळी येथील पिपºया कॉलनी परिसरात एक विहीर असून, ही विहीर सध्या कोरडीठाक पडली आहे. या कॉलनीच्या जागेवर अनेक वर्षा अगोदर शेत-शिवार होते. परंतु या ठिकाणी प्लॉट पडून नागरिकांचा रहिवास वाढला. तसेच ही कोरडी विहीरही दुर्लक्षित बनली होती. तथापि, भूगर्भातील खोलवर गेलेली जलपातळी लक्षात घेऊन पावसाचे वाया जाणारे पाणी सदर कोरड्या विहिरीत उतरविण्याकरता सर्व रहिवाशांनी ठरवले. तसेच या भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांनी विहीर पुनर्भरण उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठमोठे डबके होतात. त्यामुळे नागरिकांना वापरण्यासाठी त्रासही होतो. तेव्हा काही रहिवाशांच्या सहकार्यातून रस्त्यावरचे पावसाचे पाणी उताराकडच्या भागात उतरवून एका चारीच्या मागार्ने विहिरीच्या भागाकडे वळविले आणि विहिरीच्या भागास पाईप लावून संपूर्ण रस्त्यावरचे पाणी विहिरीत उतरवण्यात आले. हा उपक्रम जेव्हा यशस्वी झाला तेव्हा या नागरिकांना खूप आनंद झाला. या उपक्रमातून परिसरातील पावसाचे वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवले जाणार आहे. या उपक्रमाकरिता देवीदास माळी, शिवाजी सोनवणे, नबाब तडवी कमाल मिस्त्री, भाया पावरा या रहिवाशांचे सहकार्य लाभले.शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय फक्त लोकसहभागातून 'पाणी आडवा- पाणी जिरवा' हा उपक्रम आम्ही राबवू शकतो, असे या रहिवाशांनी विहीर पुनर्भरणाच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांसह रहिवाशांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातYawalयावल