शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील साकळी येथे विहीर पुनर्भरणाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:38 IST

गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देदोघा भावांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी केले सहकार्यशासनाच्या मदतीविना राबविला उपक्रम

सुधीर चौधरीचुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील पिपºया कॉलनी भागातील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.साकळी येथील पिपºया कॉलनी परिसरात एक विहीर असून, ही विहीर सध्या कोरडीठाक पडली आहे. या कॉलनीच्या जागेवर अनेक वर्षा अगोदर शेत-शिवार होते. परंतु या ठिकाणी प्लॉट पडून नागरिकांचा रहिवास वाढला. तसेच ही कोरडी विहीरही दुर्लक्षित बनली होती. तथापि, भूगर्भातील खोलवर गेलेली जलपातळी लक्षात घेऊन पावसाचे वाया जाणारे पाणी सदर कोरड्या विहिरीत उतरविण्याकरता सर्व रहिवाशांनी ठरवले. तसेच या भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांनी विहीर पुनर्भरण उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठमोठे डबके होतात. त्यामुळे नागरिकांना वापरण्यासाठी त्रासही होतो. तेव्हा काही रहिवाशांच्या सहकार्यातून रस्त्यावरचे पावसाचे पाणी उताराकडच्या भागात उतरवून एका चारीच्या मागार्ने विहिरीच्या भागाकडे वळविले आणि विहिरीच्या भागास पाईप लावून संपूर्ण रस्त्यावरचे पाणी विहिरीत उतरवण्यात आले. हा उपक्रम जेव्हा यशस्वी झाला तेव्हा या नागरिकांना खूप आनंद झाला. या उपक्रमातून परिसरातील पावसाचे वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवले जाणार आहे. या उपक्रमाकरिता देवीदास माळी, शिवाजी सोनवणे, नबाब तडवी कमाल मिस्त्री, भाया पावरा या रहिवाशांचे सहकार्य लाभले.शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय फक्त लोकसहभागातून 'पाणी आडवा- पाणी जिरवा' हा उपक्रम आम्ही राबवू शकतो, असे या रहिवाशांनी विहीर पुनर्भरणाच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांसह रहिवाशांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातYawalयावल