भुसावळ - येथील राहुल नगर भागाजवळ यावल तालुक्यातील पाडळसे येथील दोन तरुण तापी नदीत बुडून मृत्यू पावले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही दुर्घटना घडली. जयेश नारायण झोपे (वय २०) व प्रेम चंद्रशेखर चौधरी (वय १९) अशी मयतांची नावे आहेत.ही घटना सेल्फीच्या नादात घडल्याचे बोलले जात आहे. पाडळसे येथील चौघे तरुण या ठिकाणी आले होते. ते केटरर्सकडे वाढप्याचे काम करतात. दरम्यान दोघे मित्र नदीत बुडत असताना चिन्मय नितीन बºहाटे व सागर मनोहर पाटील हे काठावर उभे होते मात्र या घटनेने ते घाबरुन गेले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेने पाडळसे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
तापी नदीत बुडून दोघा तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 20:40 IST