शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:29 IST

अज्ञाताकडून घाला : केरसुणी तयार करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

उंबरखेड, ता.चाळीसगाव : केरसुण्या बनवून उदरनिर्वाह करणारी मातंग समाजाची येथे पंधरा-वीस कुटुंब आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच कोण्या अज्ञाताने घाला घातला व शिंदी वृक्षाची दोन हजार झाडे जाळून टाकली. या समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची व रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील मातंग समाजातील कुटुंबांचा पिढीजात केरसुण्या बनवून, त्या विकून त्यावर उदरनिर्वाह करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे या कुटुंबाने उंबरखेडे व दड पिंपरी शिवारातील कोरडी नाल्या काठावरील आपल्या शेतात व बांधावर चार-पाच हजार शिंदीची झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे फडे काढून केरसुण्या बनवतात व गावोगावी जाऊन विकून पैसे मिळतात.२४ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने या झाडांना आग लावून जाळल्याची घटना घडली आहे. या शेतात शेजारील शेतकरी साहेबराव कुंभार यांनी झाडे जळत असल्याचे संबंधितांना कळवले.शिंदीची झाडे जळत असल्याचे समजताच एकनाथ महादेव शिरसाट, शरद रमेश शिरसाट, बंटी शिरसाट, विकी अहिरे, राकेश धनराज शिरसाट, प्रवीण त्रिभुवन, छोटू उखाजी शिरसाट आणि प्रत्यक्षदर्शी साहेबराव कुंभार यांनी जळत असलेली झाडे विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारचे कडक ऊन व वारा यामुळे आग पसरत गेली व दोन ते तीन हजार झाडे जळून खाक झाली आहेत.त्यांच्या पोटापाण्याचे साधनच नाहीसे झाल्याने सर्व कुटुंब आजच उघड्यावर पडली आहेत.भाऊराव पंडित शिरसाट, महादू विठ्ठल शिरसाट, रमेश बंकट शिरसाट, उखाजी दामू शिरसाट, गोवा जी अप्पा शिरसाट यांच्या मालकीची ही सर्व झाडे होती.कच्चा माल मिळण्यास अडचणीशिंदी वृक्षाची झाडे जळाली.त्यामुळे शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करणाºया कुटुंबांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पुढील अनेक वर्षांचा व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालच मिळणार नसल्याने त्यांची उपासमार ठरलेली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून संबंधित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदीच्या झाडांना आग लावणाºया अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.