शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे संशयावरुन वाद, ‘एलसीबी’त दोन पोलीस कर्मचा-यांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:02 IST

आठवडाभरात ‘खाकी’चा दुस-यांदा धिंगाणा

ठळक मुद्देबीट व आर्थिक व्यवहार वादास कारणीभूतहाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21 -22 स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात सोमवारी सकाळी 11.30 वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन पोलीस कर्मचा:यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरुन दोन वर्षापासून या कर्मचा:यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु होती, ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. या हाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा आहे. पाच दिवसांपूर्वी शिघ्र कृती दलातील कर्मचा:यांनी दारु पिऊन जिल्हा क्रीडा संकुलात धिंगाणा घातला होता. या घटनेची पोलीस दलात चर्चा सुरु असताना आज पुन्हा एकदा दोन कर्मचा:यांनी चक्क पोलीस मुख्यालयाचत हाणामारी केल्याने पोलीस दलाची नाचक्की झाली आहे. काय आहे नेमका वाद?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या कार्यकाळापासून स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचा:यांमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून आजही वावरत आहेत.  तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी 13 कर्मचा:यांना ‘एलसीबी’मधून बाहेर काढले होते. राजेशसिंह चंदेल यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्रे आल्यानंतर ईश्वर सोनवणे या कर्मचा:याचे बीट बदल करण्यात आले. दिलीप येवले यांच्या सांगण्यावरुनच हे बीट बदल झाल्याचा गैरसमज झाल्यामुळे सोनवणे व येवले यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी या दोघांचे व प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यात आले. अन् ठिणगी पडलीसोमवारी सकाळी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे हे हजेरी मास्तरच्या खोलीत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन शाब्दीक वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यात कर्मचा:याचे कपडेही फाटले. शेजारीच पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे कार्यालय व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहता कर्मचा:यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही कर्मचारी वेगळे झाले. मुख्य सूत्रधार पडद्याआड.. येवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारीत मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा कर्मचा:यांमध्ये होती. हा सूत्रधार सोनवणे यांना भेटल्यानंतर पुन्हा  या दोघांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस दलाची नाचक्की

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बीट व आर्थिक व्यवहार हे दोनच मुख्य कारणे या दोन्ही कर्मचा:यांच्या वादामागे आहेत. हाणामारी झाले तेव्हा कार्यालयात एकही अधिकारी नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हे तरसोद फाटय़ाजवळील एटीएम फुटल्याने तपासाचे नियोजन करण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या दालनात होते. त्यानंतर कराळे व कुराडे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे या हाणामारीची सायंकाळर्पयत त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती मिळाली. सायंकाळर्पयत संपूर्ण शहरात या घटनेची माहिती वा:यासारखी पसरली होती.15 नोव्हेंबर रोजी  चार कर्मचा:यांनी दारु पिऊन मध्यरात्री जिल्हा क्रीडा संकूल परिसरात धिंगाणा घालून कुंडय़ा व बॅनर फाडल्याची घटना घडली होती. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच हाणामारी करतात, धिंगाणा घालतात..या प्रकारामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.