शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जळगाव येथे संशयावरुन वाद, ‘एलसीबी’त दोन पोलीस कर्मचा-यांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:02 IST

आठवडाभरात ‘खाकी’चा दुस-यांदा धिंगाणा

ठळक मुद्देबीट व आर्थिक व्यवहार वादास कारणीभूतहाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21 -22 स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात सोमवारी सकाळी 11.30 वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन पोलीस कर्मचा:यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरुन दोन वर्षापासून या कर्मचा:यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु होती, ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. या हाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा आहे. पाच दिवसांपूर्वी शिघ्र कृती दलातील कर्मचा:यांनी दारु पिऊन जिल्हा क्रीडा संकुलात धिंगाणा घातला होता. या घटनेची पोलीस दलात चर्चा सुरु असताना आज पुन्हा एकदा दोन कर्मचा:यांनी चक्क पोलीस मुख्यालयाचत हाणामारी केल्याने पोलीस दलाची नाचक्की झाली आहे. काय आहे नेमका वाद?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या कार्यकाळापासून स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचा:यांमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून आजही वावरत आहेत.  तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी 13 कर्मचा:यांना ‘एलसीबी’मधून बाहेर काढले होते. राजेशसिंह चंदेल यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्रे आल्यानंतर ईश्वर सोनवणे या कर्मचा:याचे बीट बदल करण्यात आले. दिलीप येवले यांच्या सांगण्यावरुनच हे बीट बदल झाल्याचा गैरसमज झाल्यामुळे सोनवणे व येवले यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी या दोघांचे व प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यात आले. अन् ठिणगी पडलीसोमवारी सकाळी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे हे हजेरी मास्तरच्या खोलीत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन शाब्दीक वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यात कर्मचा:याचे कपडेही फाटले. शेजारीच पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे कार्यालय व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहता कर्मचा:यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही कर्मचारी वेगळे झाले. मुख्य सूत्रधार पडद्याआड.. येवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारीत मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा कर्मचा:यांमध्ये होती. हा सूत्रधार सोनवणे यांना भेटल्यानंतर पुन्हा  या दोघांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस दलाची नाचक्की

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बीट व आर्थिक व्यवहार हे दोनच मुख्य कारणे या दोन्ही कर्मचा:यांच्या वादामागे आहेत. हाणामारी झाले तेव्हा कार्यालयात एकही अधिकारी नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हे तरसोद फाटय़ाजवळील एटीएम फुटल्याने तपासाचे नियोजन करण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या दालनात होते. त्यानंतर कराळे व कुराडे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे या हाणामारीची सायंकाळर्पयत त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती मिळाली. सायंकाळर्पयत संपूर्ण शहरात या घटनेची माहिती वा:यासारखी पसरली होती.15 नोव्हेंबर रोजी  चार कर्मचा:यांनी दारु पिऊन मध्यरात्री जिल्हा क्रीडा संकूल परिसरात धिंगाणा घालून कुंडय़ा व बॅनर फाडल्याची घटना घडली होती. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच हाणामारी करतात, धिंगाणा घालतात..या प्रकारामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.