शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

दोन किंवा तीन वेचणीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

सावध पवित्रा :बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उचलले पाऊल जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी ...

सावध पवित्रा :बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उचलले पाऊल

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपाला सामोरे जाताना सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या दोन किंवा तीन वेचण्या झाल्यानंतर कपाशीचे पीक लगेच उपटून फेकण्याच्या इराद्यानेच जवळपास सर्व शेतकऱ्यांनी यंदा कपाशी लागवडीसाठी पाऊल उचलले आहे.

जळगाव जिल्ह्यात सरासरी सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाते. त्यापैकी साधारण २० टक्के क्षेत्रावरील कापसाचे पीक हे बागायती तर उर्वरित जिरायती असते. गेल्या काही वर्षात सततच्या प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटलेले असतांना, खुल्या बाजारातही अपेक्षित भाव न मिळाल्याने कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात आणखी वाढ झाल्यानंतर कापसाची शेती तर अक्षरशः आतबट्ट्याची ठरली आहे. अशा या परिस्थितीत यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली असून, सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे पीक उपटून त्या जागी रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा मका पीक घेण्याचे नियोजन विशेषतः पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापासून करून ठेवले आहे. सुरुवातीच्या वेचण्या झाल्यानंतर नेमका बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापसाचे पीक जोपासणे खूपच जिकिरीचे ठरते. कीड लागलेल्या कापसाचा दर्जा खराब झाल्याने बाजारात त्यास फार किंमत मिळत नाही. शिवाय कीड लागलेले बोंड वेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मजुरीचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. अतोनात मेहनत घेऊनही हाती काही पडत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो. या सर्व गोष्टींचा विचार करता काही शेतकरी फरदड कापसाचे उत्पादन घेण्याऐवजी हिवाळ्यात त्या क्षेत्रात रब्बी पिके घेऊन दोन हंगाम घेण्यात यशस्वी ठरल्याचीही उदाहरणे आहेत.

-----------------

हाच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या खरिपात बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीच्या जुन्या पद्धतीला मूठमाती देऊन बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याची नवी व्यूहरचना आतापासून आखल्याचे निदर्शनास आले आहे. कापसाच्या एकूण उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात चांगली सुधारणा होण्याचे संकेत त्यामुळे प्राप्त झाले आहेत.

-----------------

(कोट)...

गेल्या वर्षीच्या हंगामात १२ एकरावर कपाशीची लागवड केल्यानंतर बोंडअळीमुळे जेमतेम ९५ क्विंटल कापसाचे उत्पादन एकाच वेचणीतून मिळाले होते. सुदैवाने कापसाचे पीक उपटून रब्बीत गहू घेतल्याने नुकसान भरून निघाले. यंदाही पहिल्या दोन- तीन वेचण्या झाल्यानंतर जास्त लोभात न पडण्याचा निर्णय घेत १५ एकरावर पूर्वहंगामी कपाशी लागवड केली आहे.

- प्रशांत ढाके, शेतकरी, ममुराबाद

-------

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे सततचे नुकसान लक्षात घेता कापसाचे फरदड पीक घेण्याऐवजी नंतरच्या हंगामात गहू, हरभरा, संकरीत ज्वारी, मक्याचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे बोंडअळी आटोक्यात येणे शक्य झाले आहे.

- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव

-----------------

फोटो-

बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीत सावध भूमिका घेतली आहे.