शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

दोन महिने उलटूनही सहा लाखांची लूट करणारे लुटारू पोलिसांना गवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:30 IST

तपास थंडावला : भरदिवसा झाला होता गोळीबार

पहूर, ता.जामनेर : भरदिवसा गोळीबार करून सहा लाखांची लूट करणारे लूटारू दोन महिने होऊनही पोलिसांना गवसत नसल्याने पोलिसांचा या प्रकरणातील तपास थंडावल्याची स्थिती आहे.बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या अजिंठा ट्रेडर्स पंपाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत बंदूकीचा धाख दाखवून हवेत गोळीबार करीत त्यांच्या ताब्यातून ६ लाख ३० हजार रुपये घेऊन लूटारुंनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी दोन महिन्यांपूर्वी जामनेर रोडवर घडली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतांनाही पोलीस तपास थंडावल्याचे दिसून येत आहे. लुटारुंना पोलिसांचा धाक नसल्याचे बोलले जात आहे.अजिंठा ट्रेडर्स पंपाचे कर्मचारी संजय पारखे व समाधान कुंभार हे पंपाचा भरणा ६ लाख ३० हजार रुपये बँँकेत भरण्यासाठी दुचाकीने जात असताना जामनेर रोडवरील बँकेच्या जवळ ते पोहोचले. यादरम्यान तीन युवक दुचाकी वर येवून या पंंपावरी कर्मचाºयांना सुरुवातीला मारहाण करून बंदूकीचा धाख दाखवित हवेत गोळीबार केला व ६ लाख ३० हजार घेऊन पोबारा केल्याची घटना गेल्या १८ फेब्रुवारी रोजी भरदिवसा घडली होती. याप्रकरणी पहूर पोलिसात जबरी चोरीचा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही गंभीर घटना कर्मचाºयांच्या जिवावर बेतली होती. या घटनेला दोन महिने पंधरा दिवस झाले आहे. पण पोलिसांना एकही धागा यात गवसला नाही. तपास थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या दिवशी पाचोरा विभागाचे नवनियुक्त डीवाय एसपी ईश्वर कातकडे यांनी पदभार घेतल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी लुटारुंच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे सांगितले होते. दोन महिने उलटून लुटारू पोलिसांच्या भयमुक्त वातावरणात मुक्त संचार करीत असल्याने पोलीस त्यांना जेरबंद करण्यास अयशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपूर्वी पेठ मधील रहिवासी तथा ठाणे जिल्ह्याचे जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक पंढरीनाथ पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना गुलदस्त्यातच आहे. याच प्रमाणे कासली येथील महिलेचा खून,वाकडीतील ग्रा.पं. विनोद चांदणे याचे भरदिवसा अपहरण करून दहादिवसानंतर खून झाल्याचे निष्पन्न, वाकोदचा तरूण सराफा व्यापाºयावर प्राणघातक हल्ला, पहूर येथे रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर होणारी दारू विक्री, यामुळे सर्व सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात येवूनकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गुन्ह्याचा आलेख कमी होण्या ऐवजी वाढत आहे. डिवाय एसपींच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लुटारूंना जेरबंद करण्यात पोलीस असमर्थ ठरले. वाकडीतील विनोद चांदणे प्रकरणातही मुख्यसुत्रधार तपासात निष्पन्न झाला नाही.त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसांपासून गंभीर बनल्याचे चित्र आहे.संबंधित लुटारूंच्या मागावर पोलीस असून याबाबत तपास सुरू आहे.-दिलीप शिरसाट,साहाय्यक पोलीस निरीक्षक पहूर,ता.जामनेर.