शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

दोनशे ट्रॅक्टर मोजणीच्या प्रतीक्षेत उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 00:15 IST

जामनेर: बारदान संपल्याने तूर खरेदी ठप्प, शेतकरी हतबल,

जामनेर : येथील बाजार समिती आवारात सुरू असलेल्या शासकीय  तूर खरेदी केंद्रावर बारदान       संपल्याने गुरुवार सकाळपासूनच खरेदी ठप्प झाली आहे. शासनाने तुरीसाठी हमी भाव जाहीर केल्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात केंद्रावर तूर आणत आहेत. मात्र गेल्या आठवडय़ात ग्रेडर नसल्याने खरेदी बंद होती. ग्रेडर आल्यावर खरेदी सुरू झाली खरी; मात्र आता बारदान संपल्याने पुन्हा खरेदीत विघ्न निर्माण झाले असून नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.आतार्पयत सुमारे 1 हजार 500 क्विंटल तूर खरेदी झाली असून बाजार समिती आवारात तुरीने भरलेले सुमारे 200 ट्रॅक्टर मोजणीअभावी उभे आहेत. ट्रॅक्टरचे दररोजचे भाडे परवडत नसल्याने शेतक:यांनी तुरीचे पोत्यांचे उघडय़ावर ठेवले आहेत. राज्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने व वातावरणातील बदल पाहून शेतकरीदेखील उघडय़ावरील तुरीमुळे चिंतेत आहे. व्यापा:यांकडून शेतक:याची तूर चार हजार ते चार हजार दोनशे या भावाने खरेदी केली जात असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहे. नाफेडकडून खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने जमा होत असून यासाठीसुद्धा दहा ते पंधरा दिवस लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पुढा:यांबद्दल संतापदरम्यान, तूर उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून पंधरा   दिवसांपासून केंद्रावर थांबावे लागत आहे. केवळ निवडणुकीत मते मागायला येणा:या  राजकारण्यांविषयी शेतक:यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतक:यांच्या समस्यांवर रस्त्यांवर उतरून आंदोलन करणारे पुढारी आता गप्प कसे, असा सवाल विचारला जात आहे.गेल्या दहा दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर केंद्रावर थांबून आहे. आज खरेदीसाठी नंबर लागला असतानाच बारदान संपल्याने खरेदी बंद झाली. शेतक:यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.-उमेश जैन, शेतकरी, तळेगावबारा दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात थांबून आहे. आजर्पयत नंबर लागला नाही. वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तुरीच्या होणा:या नुकसानीला कोण जबाबदार राहील. मोजणीसाठी काटे वाढवावेत व बारदान लवकर उपलब्ध करून द्यावे.-शालिग्राम नारायण पाटील,शेतकरी, चिंचखेडे बुद्रूकगेल्या आठ दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर घेऊन थांबलो आहे. संथगतीने मोजणी होत असल्याने व मध्येच व्यापा:यांची तूर वशिलेबाजीने मोजली जात असल्याने आमचा नंबर लागत नाही. शेतकरी संघाने याकडे लक्ष घालून शेतक:यांच्या समस्या                   सोडवाव्यात.-संजय सुरळकर,शेतकरी, फत्तेपूर लोणीतूर खरेदी नियमितपणे सुरू होती. मात्र डीएमओ कार्यालयाकडून बारदान पुरवठा होत नसल्याने खरेदी नाइलाजास्तव थांबवावी लागली. बारदान उपलब्ध करावे यासाठी यापूर्वीच त्यांचेकडे मागणी केली आहे. बारदान मिळताच खरेदी सुरू केली जाईल.-चंद्रकांत बाविस्कर,चेअरमन, शेतकरी सहकारी संघ