शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 21:59 IST

उंदिरखेडे : ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

पारोळा : जोरदार पावसामुळे लेंडी नदीला पूर आल्याने उंदिरखेडे येथील दोन शेतकरी पुरात अडकले होते. ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून त्यांना बाहेर काढण्यात यश आले.तालुक्यातील चोरवड, जोगलखेडे परिसरात २१ रोजी दुपारी दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उंदिरखेडे येथील लेंडी नदीला पूर आला. त्यात दोन शेतकरी अडकल्याने भीतीचे वातावरण पसरले होत. मात्र तीन ते साडेतीन तासांच्या गावक-यांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शेतकरी मोटरसायकलने शेतातून घरी निघाले असता नदी दुथडी वाहत होती. पात्र पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने कैलास पंडीत पाटील (५६) व धर्मराज अभिमन देसले हे दोघे मोटरसायकल नदीमधुन नेत असताना पाण्यात अडकले. पाण्याचा प्रवाह पाहता आपली दुचाकी निघणे शक्य नसल्याने या दोघे नदीमध्ये असलेल्या खडकावर उभे राहिले. ही बातमी उंदिरखेडे गावात व परिसरात पसरताच नदी काठावर गांवक-यांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी त्यांच्यापर्यंत दोर फेकले. त्यांनी दोर धरून ठेवित सुमारे साडेतीन तासाच्या अवधीनंतर रात्री ८ .३० वाजता नदीला पाणी कमी झाल्या नंतर दोघे सुखरूप बाहेर आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश बापुराव पाटील, चेतन पाटील, राजु देसले आदींनी परिश्रम घेतले.