शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
6
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
7
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
8
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
9
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
10
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
12
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
13
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
14
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
15
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
16
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
17
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
18
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
19
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
20
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा

वीस दिवस उलटूनही मदतीची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST

प्रमोद ललवाणी कजगाव, ता. भडगाव : ३१ ऑगस्ट व नंतर ८ सप्टेंबरला लागोपाठ आलेल्या दोन महापुराने सारंच वाहतं झालं. ...

प्रमोद ललवाणी

कजगाव, ता. भडगाव : ३१ ऑगस्ट व नंतर ८ सप्टेंबरला लागोपाठ आलेल्या दोन महापुराने सारंच वाहतं झालं. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री या साऱ्यांचा पाहणी दौरा पार पडला. संगतीला शासकीय ताफादेखील हजर होता. पंचनाम्याचा सोपस्कारही पार पडला. आता नुकसानग्रस्तांच्या नजरा मदतीच्या घोषणेकडे लागल्या आहेत, मात्र त्याबाबत कोणी बोलायला तयार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

पुरामळे शेत, विहिरी, पाईपलाईन हेदेखील सार वाहतं झालं. मोठ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. त्यासाठी बँकांनी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने आदेश करावे, अशीही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

१९९८ नंतर तितुर नदीला आलेल्या या महापुराने कजगाव परिसरातील चार खेड्यातील असंख्य शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे पीक काही तासात होत्याचे नव्हते झाले.

तब्बल २३ वर्षांनंतर तितुर नदीला एक नाही तर आठच दिवसात दोन महापूर आले अन नदीकाठावरील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास या महापुराने सरळ वाहून नेला. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

नदीकाठावरील दिव्यांग वयोवृद्ध शेतकरी शिवसिंग राजधर पाटील यांची पाच बिघे शेती केटीवेयरला लागून आहे. ३१ ला आलेल्या महापुरात संपूर्ण शेतातील कपाशी व कांदा हे पीक मुळासकट वाहत गेले. पुराच्या प्रवाहाने पाच बिघे शेतापैकी दोन बिघे शेतदेखील वाहून गेल्याने या जागेत १० ते १५ फुटांचा खड्डा पडला आहे.

विशेष बाब म्हणून शासन स्थरावरून मदतीचा हात मिळाला तरच हा दिव्यांग शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल. अन्यथा महापुरात जसं शेत वाहत झालं तसंच त्याचं स्वप्न वाहतं होईल. अशीच परस्थिती इतर शेतकऱ्यांचीदेखील आहे.

दुसऱ्या बाजूला असलेले शेतकरी शांताराम चौधरी यांची तर चक्क विहीर जमीनदोस्त झाली. महापुराचे पाणी सरळ शेतात गेल्याने नदीच्या काठावर असलेली विहीर पूर्ण कोसळली अन जमीनदोस्त झाली. सोबत सारी पाईपलाईन पुरात वाहून गेली. याच पद्धतीने रामसिंग सुपडू पाटील यांच्या शेतजमिनीसह व केळीची झाडे पुरात वाहून गेली.

मदत मिळण्यासाठी अनेक टप्पे पार पडतील. मग कुठे मोडकातोडका निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. तोपर्यंत बंजर झालेली शेती पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

करोडोंचा फटका

लागोपाठ एकाच आठवड्यात आलेल्या दोन महापुराने करोडो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले हातातोंडाशी आलेला घास या पुरात वाहता झाला. सोबत शेतजमिनीदेखील वाहिल्या. मंत्री, खासदार, आमदारासह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, पंचनामे झाले. सारे सोपस्कार झाले. साऱ्यांनी गुळगुळीत आश्वासनेदेखील दिली, मात्र पूर येऊन २० दिवस उलटले, मात्र अद्याप मदतीची घोषणा नाही.

लक्ष आता मदतीकडे

महापुराच्या प्रवाहात शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे सारे आर्थिक गणित चुकले. वर्षभराचा हिशोब विस्कळीत झाला आहे. दुसरीकडे कजगावसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या केटीवेयरचा भराव वाहून गेल्याने या केटीवेयरचे पाणी तेथून वाहत असल्याने या केटीवेयरचा भराव तत्काळ केला तरच त्यात पाणी थांबेल अन्यथा तो कोरडा पडेल व उन्हाळ्यात पुन्हा दुष्काळ पडेल.