शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

बारावी परीक्षेबाबत तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीची परीक्षा रद्द झाली. पण, बारावीची परीक्षा होणार आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावीची परीक्षा रद्द झाली. पण, बारावीची परीक्षा होणार आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे राज्य शासनाने तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जुक्टो संघटनेच्यावतीने करण्‍यात आली आहे.

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून कुठेही इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. शैक्षणिक कामकाज ऑनलाइन झाले. तसेच शहरी विभागातील ७० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाचा स्वीकार केला. परंतु ग्रामीण भागामध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही ऑनलाइन पध्दतीने पूर्ण करण्‍यात आला. पण, दुसरी लाट आल्यामुळे बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पण, राज्याच्या आठ विभागांमध्ये अजून बारावी परीक्षेबाबत कुठलाही निर्णय नसल्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने बारावीच्या परीक्षा संदर्भात शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण तज्ञ या सर्वांचे मत जाणून घेऊन परीक्षा कशा पद्धतीने घ्यावयाच्या या संदर्भात तत्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा. परीक्षेची पद्धत मूल्यमापनाचे निकष, मौखिक व प्रात्यक्षिक बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप या संदर्भात सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी शासनाकडे जुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव शैलेश राणे, कार्याध्यक्ष सुनील पाटील, नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड, डी.डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा.राजेश बडगुजर, प्रा.संजय चौधरी, प्रा.संजय पाटील, प्रा.पी.पी. पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.भारती महाजन आदींनी केली आहे.