महाजेनकोच्या राज्यातील विद्युत निर्मिती प्रकल्पांचे दहा संच बंद असल्याने राज्याच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. यात दीपनगर प्रकल्पाच्या दोन संचांचा समावेश आहे. यामुळे पाच हजार मेगाव्ॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. विजेची तूट भरून काढण्यासाठी एनटीपीसीकडून (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) चार हजार 857 मेगाव्ॉट विजेचा पुरवठा होत आहे. त्यानंतरही 329 मेगाव्ॉटचा तुटवडा आहे. महाजेनकोच्या राज्यातील कोराडी, पारस, चंद्रपूर प्रकल्पांतील प्रत्येकी एक-एक संच, दीपनगरचे दोन व परळीचे पाच असे 10 संच बंद आहेत. त्यापैकी परळी येथील संच पाण्याअभावी बंद आहेत. तर कोराडीच्या बंद दोनपैकी एक संच बुधवारी सुरू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी दुपार्पयत राज्यात महाजेनको व अन्य वीजनिर्मिती केंद्रातून 12 हजार 380 मेगाव्ॉट वीजनिर्मिती झाली. मात्र राज्याची मागणी 17 हजार 566 मेगाव्ॉट इतकी होती. यामुळे 5 हजार 186 मेगाव्ॉटची तूट निर्माण झाली होती. पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत आहे. मात्र खडका ट्रान्समिशन यार्डात तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ प्रकल्पातील संच क्र. दोन व तीन बंद करण्यात आले होते. प्रकल्पाला एक महिना पुरेल एवढा कोळसा उपलब्ध आहे. - अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर प्रकल्प.
दीपनगरसह वीजनिर्मितीचे दहा संच बंद
By admin | Updated: November 19, 2015 00:40 IST