शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्ज वसुली बंद करा, वीज पुरवठा कापू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:37 IST

पालकमंत्री चंंद्रकांत पाटील यांचे आदेश

ठळक मुद्दे६९ गावांसाठी ४७ टँकर सुरु

जळगाव : टंचाई स्थिती लक्षात घेता कर्ज वसुली तात्काळ थांबवावी तसेच पाणी योजनांकडे थकबाकी असली तरी वीज पुरवठा बंद करू नये, असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिले.अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठक झाली. यासस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे मोराणकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.कर्ज वसुली तातडीने थांबवावीबैठकीत टंचाईची स्थिती लक्षात घेऊन जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता एस.बी.नरवाडे यांच्याकडून पालकमंत्र्यांनी योजना निहाय माहिती घेतली. पालकमंत्री म्हणाले की, वीजबिल न भरल्यामुळे एकही पाणीपुरवठा योजना बंद करु नये. शेतकऱ्यांकडील कर्जवसुली तातडीने थांबवावी. दुष्काळी भागासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून ते कार्यान्वित करावे. नागरिकांना टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची शुध्दताही तपासण्याबरोबरच भविष्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घ्यावा, यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठक घेण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी दिली.३६ कोटींच्या आराखड्यावर चर्चाया बैठकीत सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १००३ गावांसाठी सुचविण्यात आलेल्या १६२० उपायोजनांसाठी तयार करण्यात आलेल्या ३६.२४ कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ६९ गावांसाठी ४७ टँकर सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.