शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

लसीकरणानंतरही त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीकरण झाल्यानंतरसुद्धा मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे ह्या त्रिसूत्रीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लसीकरण झाल्यानंतरसुद्धा मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर लसीकरण सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा.मोहन पावरा, प्रतीभा सुर्वे, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर उपस्थित होते.

लसींचा तुटवडा होऊ देणार नाही..

जळगाव जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी करण्यात जिल्हा अधिकारी, जिल्हा शल्क चिकित्सक, सर्व आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा व नागरिकांचे या सर्वांचे सहकार्य आहे. सरकार म्हणून लसीकरणाचा तुटवडा होऊ देणार नाही. महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना लसीकरण करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. प्रा.ई.वायुनंदन यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक यांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाकडून विद्यापीठास नेहमीच सहकार्य मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ.भादलीकर यांनी केले. सूत्रसंचलन व आभार सुभाष पवार यांनी मानले.

१६० कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस

लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, डाटा ऑपरेटर प्रदीप पाटील, आरोग्य कर्मचारी विकास धनगर, संगीता साळुंखे, हितेश महाजन उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील १६० कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय. पाटील, एस.आर. गोहिल, बी.पी. पाटील, डॉ. सोमनाथ वडनेरे, अरुण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावीत, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभीम गिरी, मयूर पाटील, पद‌्माकर कोठावदे, के.सी. पाटील, मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे आदींनी परिश्रम घेतले.