शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

'आरटीपीसीआर' ची अट शिथिल करताच विमानाच्या प्रवासी संख्येचे तिपटीने उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे पाठ फिरवली होती. मात्र, शासनाने १ जून पासून आरटीपीसीआरची अट उठविल्याने, विमानसेवेची प्रवासी संख्या तिपटीने वाढली आहे. शनिवारी जळगावहुन मुंबईला विमानाने ४१ प्रवाशी गेले असल्याचे विमान कंपनीने सांगितले. आरटीपीआर चाचणीची सक्ती बंद केल्यामुळेच दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच विमानाला जळगावहुन बऱ्यापैकी प्रवाशी मिळाले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणानांना निर्बंध घातले होते. यामध्ये सध्या जळगावला विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून विमानाने मुंबईत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर'चाचणी बंधनकारक केली होती. या मध्ये मुंबई विमानतळावरून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआरच्या निर्णयामुळे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या ७२ आसनी विमानात बोटावर मोजण्या इतकेच प्रवाशी मुंबईला जात होते.

इन्फो :

अन् प्रवासी संख्या झाली तिप्पट

राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्यानंतर, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील 'आरटीपीसीआर' चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.

इन्फो :

कोरोनामुळे विमानाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असतांना, त्यात आरटीपीसीआरच्या चाचणीमुळेही प्रवाशांची संख्या कमी झाली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबई मनपाने आरटीपीसीआर चा निर्णय मागे घेतल्याने, तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अखिलेश सिंग, व्यवस्थापक, विमान कंपनी.