शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

'आरटीपीसीआर' ची अट शिथिल करताच विमानाच्या प्रवासी संख्येचे तिपटीने उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे पाठ फिरवली होती. मात्र, शासनाने १ जून पासून आरटीपीसीआरची अट उठविल्याने, विमानसेवेची प्रवासी संख्या तिपटीने वाढली आहे. शनिवारी जळगावहुन मुंबईला विमानाने ४१ प्रवाशी गेले असल्याचे विमान कंपनीने सांगितले. आरटीपीआर चाचणीची सक्ती बंद केल्यामुळेच दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच विमानाला जळगावहुन बऱ्यापैकी प्रवाशी मिळाले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणानांना निर्बंध घातले होते. यामध्ये सध्या जळगावला विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून विमानाने मुंबईत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर'चाचणी बंधनकारक केली होती. या मध्ये मुंबई विमानतळावरून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआरच्या निर्णयामुळे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या ७२ आसनी विमानात बोटावर मोजण्या इतकेच प्रवाशी मुंबईला जात होते.

इन्फो :

अन् प्रवासी संख्या झाली तिप्पट

राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्यानंतर, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील 'आरटीपीसीआर' चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.

इन्फो :

कोरोनामुळे विमानाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असतांना, त्यात आरटीपीसीआरच्या चाचणीमुळेही प्रवाशांची संख्या कमी झाली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबई मनपाने आरटीपीसीआर चा निर्णय मागे घेतल्याने, तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अखिलेश सिंग, व्यवस्थापक, विमान कंपनी.