शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीपीसीआर' ची अट शिथिल करताच विमानाच्या प्रवासी संख्येचे तिपटीने उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे पाठ फिरवली होती. मात्र, शासनाने १ जून पासून आरटीपीसीआरची अट उठविल्याने, विमानसेवेची प्रवासी संख्या तिपटीने वाढली आहे. शनिवारी जळगावहुन मुंबईला विमानाने ४१ प्रवाशी गेले असल्याचे विमान कंपनीने सांगितले. आरटीपीआर चाचणीची सक्ती बंद केल्यामुळेच दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच विमानाला जळगावहुन बऱ्यापैकी प्रवाशी मिळाले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणानांना निर्बंध घातले होते. यामध्ये सध्या जळगावला विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून विमानाने मुंबईत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर'चाचणी बंधनकारक केली होती. या मध्ये मुंबई विमानतळावरून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआरच्या निर्णयामुळे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या ७२ आसनी विमानात बोटावर मोजण्या इतकेच प्रवाशी मुंबईला जात होते.

इन्फो :

अन् प्रवासी संख्या झाली तिप्पट

राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्यानंतर, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील 'आरटीपीसीआर' चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.

इन्फो :

कोरोनामुळे विमानाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असतांना, त्यात आरटीपीसीआरच्या चाचणीमुळेही प्रवाशांची संख्या कमी झाली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबई मनपाने आरटीपीसीआर चा निर्णय मागे घेतल्याने, तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

अखिलेश सिंग, व्यवस्थापक, विमान कंपनी.