शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

टँकरवर दीड कोटी खर्च, तरीही जळगावकर तहानलेलेच

By विलास.बारी | Updated: September 27, 2017 18:00 IST

जळगाव जिल्ह्यात ३६ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्चनिधीअभावी तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवरसध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे पाणीपुरवठाआठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२७ : अनियमित पाऊस, गावातील जलस्त्रोताची बिकट स्थिती आणि पाणी योजनांच्या कामातील अनियमितता यामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. पावसाळा संपत आला असताना ३६ गावांमध्ये १८ टँकर आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतर्फे या वर्षभरात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च होऊनही जळगावकर तहानलेलेच आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च झाला आहे.७ कोटी ३५ लाखांचा टंचाई आराखडाजिल्हा प्रशासनातर्फे सन २०१६/१७ या वर्षाचा टंचाई आराखडा घोषित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना, खाजगी विहिर अधिग्रहण तसेच विंधन विहिर ताब्यात घेण्यासाठी सात कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांच्या संभाव्य टंचाई आराखड्याचे नियोजन करण्यात आले.समाधानकारक पावसाअभावी टँकर कायमगेल्यावर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्याने अमळनेर, जामनेर, पारोळा, जळगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यातील गावांमध्ये टंचाई कायम आहे. या तालुक्यांमध्ये सध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपत आला असताना देखील या गावांमध्ये टँकर सुरु आहे.टँकरवर दीड कोटींचा खर्चजिल्हा प्रशासनातर्फे अमळनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा या आठ तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत आठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. त्यात ९४ हजार ४०० रुपये खाजगी विहिर अधिग्रहणावर खर्च झाला आहे.तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवरपाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतींकडून तात्पुरत्या पाणी योजनेचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यानुसार ११ गावातील तात्पुरत्या योजनांसाठी ७४ लाख ७४ हजार ३९५ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र या योजनांसाठी रक्कम प्राप्त न झाल्याने ही कामे सध्यातरी उधारीवर सुरु आहेत. यासोबतच आडवे बोअर, विहीर खोलीकरण, न.पा. विशेष दुरुस्ती योजना, विंधन विहीर, कूपनलिका घेणे यासाठी शासनाकडून निधी मिळालेला नाही.