शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टँकरवर दीड कोटी खर्च, तरीही जळगावकर तहानलेलेच

By विलास.बारी | Updated: September 27, 2017 18:00 IST

जळगाव जिल्ह्यात ३६ गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्चनिधीअभावी तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवरसध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे पाणीपुरवठाआठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२७ : अनियमित पाऊस, गावातील जलस्त्रोताची बिकट स्थिती आणि पाणी योजनांच्या कामातील अनियमितता यामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. पावसाळा संपत आला असताना ३६ गावांमध्ये १८ टँकर आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतर्फे या वर्षभरात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च होऊनही जळगावकर तहानलेलेच आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात टँकरवर ३० लाखांचा खर्च झाला आहे.७ कोटी ३५ लाखांचा टंचाई आराखडाजिल्हा प्रशासनातर्फे सन २०१६/१७ या वर्षाचा टंचाई आराखडा घोषित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजना, खाजगी विहिर अधिग्रहण तसेच विंधन विहिर ताब्यात घेण्यासाठी सात कोटी ३५ लाख ५ हजार रुपयांच्या संभाव्य टंचाई आराखड्याचे नियोजन करण्यात आले.समाधानकारक पावसाअभावी टँकर कायमगेल्यावर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात सरासरी कमी पाऊस झाल्याने अमळनेर, जामनेर, पारोळा, जळगाव, बोदवड व भुसावळ तालुक्यातील गावांमध्ये टंचाई कायम आहे. या तालुक्यांमध्ये सध्या ३६ गावांमध्ये १८ टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळा संपत आला असताना देखील या गावांमध्ये टँकर सुरु आहे.टँकरवर दीड कोटींचा खर्चजिल्हा प्रशासनातर्फे अमळनेर, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा या आठ तालुक्यांमध्ये उन्हाळ्यात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत आठ तालुक्यात टँकरवर एक कोटी ५४ लाख ३८ हजार २८६ रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. त्यात ९४ हजार ४०० रुपये खाजगी विहिर अधिग्रहणावर खर्च झाला आहे.तात्पुरत्या पाणी योजनांची कामे उधारीवरपाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतींकडून तात्पुरत्या पाणी योजनेचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यानुसार ११ गावातील तात्पुरत्या योजनांसाठी ७४ लाख ७४ हजार ३९५ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. मात्र या योजनांसाठी रक्कम प्राप्त न झाल्याने ही कामे सध्यातरी उधारीवर सुरु आहेत. यासोबतच आडवे बोअर, विहीर खोलीकरण, न.पा. विशेष दुरुस्ती योजना, विंधन विहीर, कूपनलिका घेणे यासाठी शासनाकडून निधी मिळालेला नाही.