शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात १६०० कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:19 IST

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. ...

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. अंगणवाडी येथून राबविल्या जाणाऱ्या काही योजनांवरही कोरोनाचा परिणाम झाला, मात्र कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांचे नियमित उपचार या काळातही सुरू होते. गेल्या वर्षी १६०० कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले असून यातील ८००बालके ही कुपोषणमुक्त झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालक व मतांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधी माता व बालकांना अंगणवाडीत शिजवलेला आहार दिला जात होता. मात्र कोरोनामुळे हा आहार बंद करून थेट धान्य दिले जात आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी हे धान्य पोचविले जाते. जिल्ह्यात जवळपास ३ हजार अंगणवाड्या आहेत. मात्र कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील काही भागात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालके आढळून येत असतात. यात अधिकांश बालके ही आदिवासी पाड्यावरील असतात. या बालकांचे नियमित वजन करणे, त्यात कमी वजनाची बालकांची परिस्थिनुसार तीव्र आणि मध्यम कुपोषित अशी नोंद करून त्या नुसार उपचार केले जातात. यात माता व बालकांना सकस आहार दिला जातो.

तीन महिन्यात ४०० बालके

तीन महिन्यात साधारण ४०० बालकांना सकस आहार देणे, विटामिन, कॅल्शियम गोळ्या देणे, नियमित त्यांचे वजन करणे आणि नंतर बालकाचे वजन सामान्य भरल्यानंतर कुपोषमुक्त घोषित केले जाते. अश्या १६०० बालकांवर उपचार करण्यात आले.

४००० बालके पाच वर्षात कुपोषणमुक्त

दरवर्षी तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केल्यानंतर साधारण ८०० बालके कुपोषणमुक्त होतात. गेल्या पाच वर्षात साधारण ४ हजार बालके कुपोषण मुक्त झाली.

कोट

कोरोना काळातही आहाराचे नियमित वाटप सुरूच होते. बालकांचे नियमित वजन केले जाते, तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. मार्चपासून कुपोषणमुक्तीचा पुढील वर्षाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. - आर. आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प

मनुष्यबळाची अडचण

महिला व बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यात अनेक आदिवासी तालुक्यात प्रकल्प अधिकारी नसल्याचे गंभीर चित्र आहे. वारंवार जि.प.कडून प्रस्ताव गेल्यानंतरही ही पदे भरली जात नसल्याने विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.