शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वर्षभरात १६०० कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:19 IST

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. ...

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. अंगणवाडी येथून राबविल्या जाणाऱ्या काही योजनांवरही कोरोनाचा परिणाम झाला, मात्र कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांचे नियमित उपचार या काळातही सुरू होते. गेल्या वर्षी १६०० कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले असून यातील ८००बालके ही कुपोषणमुक्त झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालक व मतांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधी माता व बालकांना अंगणवाडीत शिजवलेला आहार दिला जात होता. मात्र कोरोनामुळे हा आहार बंद करून थेट धान्य दिले जात आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी हे धान्य पोचविले जाते. जिल्ह्यात जवळपास ३ हजार अंगणवाड्या आहेत. मात्र कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील काही भागात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालके आढळून येत असतात. यात अधिकांश बालके ही आदिवासी पाड्यावरील असतात. या बालकांचे नियमित वजन करणे, त्यात कमी वजनाची बालकांची परिस्थिनुसार तीव्र आणि मध्यम कुपोषित अशी नोंद करून त्या नुसार उपचार केले जातात. यात माता व बालकांना सकस आहार दिला जातो.

तीन महिन्यात ४०० बालके

तीन महिन्यात साधारण ४०० बालकांना सकस आहार देणे, विटामिन, कॅल्शियम गोळ्या देणे, नियमित त्यांचे वजन करणे आणि नंतर बालकाचे वजन सामान्य भरल्यानंतर कुपोषमुक्त घोषित केले जाते. अश्या १६०० बालकांवर उपचार करण्यात आले.

४००० बालके पाच वर्षात कुपोषणमुक्त

दरवर्षी तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केल्यानंतर साधारण ८०० बालके कुपोषणमुक्त होतात. गेल्या पाच वर्षात साधारण ४ हजार बालके कुपोषण मुक्त झाली.

कोट

कोरोना काळातही आहाराचे नियमित वाटप सुरूच होते. बालकांचे नियमित वजन केले जाते, तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. मार्चपासून कुपोषणमुक्तीचा पुढील वर्षाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. - आर. आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प

मनुष्यबळाची अडचण

महिला व बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यात अनेक आदिवासी तालुक्यात प्रकल्प अधिकारी नसल्याचे गंभीर चित्र आहे. वारंवार जि.प.कडून प्रस्ताव गेल्यानंतरही ही पदे भरली जात नसल्याने विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.