शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्ह्यात वर्षभरात १६०० कुपोषितांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:19 IST

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. ...

जळगाव: कोरोनानने सर्व क्षेत्रांवर परिणाम केल्याने याचे काही वाईट परिणाम समोर आले आहेत, अनेक कामे २०२० मध्ये ठप्प होती. अंगणवाडी येथून राबविल्या जाणाऱ्या काही योजनांवरही कोरोनाचा परिणाम झाला, मात्र कुपोषित बालकांच्या योजना आणि त्यांचे नियमित उपचार या काळातही सुरू होते. गेल्या वर्षी १६०० कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले असून यातील ८००बालके ही कुपोषणमुक्त झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत बालक व मतांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधी माता व बालकांना अंगणवाडीत शिजवलेला आहार दिला जात होता. मात्र कोरोनामुळे हा आहार बंद करून थेट धान्य दिले जात आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी हे धान्य पोचविले जाते. जिल्ह्यात जवळपास ३ हजार अंगणवाड्या आहेत. मात्र कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील काही भागात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालके आढळून येत असतात. यात अधिकांश बालके ही आदिवासी पाड्यावरील असतात. या बालकांचे नियमित वजन करणे, त्यात कमी वजनाची बालकांची परिस्थिनुसार तीव्र आणि मध्यम कुपोषित अशी नोंद करून त्या नुसार उपचार केले जातात. यात माता व बालकांना सकस आहार दिला जातो.

तीन महिन्यात ४०० बालके

तीन महिन्यात साधारण ४०० बालकांना सकस आहार देणे, विटामिन, कॅल्शियम गोळ्या देणे, नियमित त्यांचे वजन करणे आणि नंतर बालकाचे वजन सामान्य भरल्यानंतर कुपोषमुक्त घोषित केले जाते. अश्या १६०० बालकांवर उपचार करण्यात आले.

४००० बालके पाच वर्षात कुपोषणमुक्त

दरवर्षी तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केल्यानंतर साधारण ८०० बालके कुपोषणमुक्त होतात. गेल्या पाच वर्षात साधारण ४ हजार बालके कुपोषण मुक्त झाली.

कोट

कोरोना काळातही आहाराचे नियमित वाटप सुरूच होते. बालकांचे नियमित वजन केले जाते, तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. मार्चपासून कुपोषणमुक्तीचा पुढील वर्षाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. - आर. आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी, जि.प

मनुष्यबळाची अडचण

महिला व बालकल्याण विभागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यात अनेक आदिवासी तालुक्यात प्रकल्प अधिकारी नसल्याचे गंभीर चित्र आहे. वारंवार जि.प.कडून प्रस्ताव गेल्यानंतरही ही पदे भरली जात नसल्याने विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.