शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महाविद्यालयाचे तात्पुरत्या स्वरुपात जळगावात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:28 IST

मुक्ताईनगरातून हलविणार : 101 पदांना अजून मंजुरी नाही

जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या धर्तीवर मुक्ताईनगर येथे मागील दोन वर्षापासून सुरू असलेले शासकीय कृषी महाविद्यालयदेखील मुख्यालयी म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शहरानजीकच्या निमखेडी येथील तेलबिया संशोधन केंद्रात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या वृत्ताला तेलबिया संशोधन केंद्रातील वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे. मुक्ताईनगर येथे 2015 मध्ये शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाले. सध्या ते खडसे महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्देशित दरांनुसार भाडय़ाच्या सहा खोल्यांमध्ये सुरू आहे. तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने नागपूर महामार्गालगत या महाविद्यालयाशी संबंधित प्रयोग व इतर कार्यक्रमासाठी 100 एकर जमीनही उपलब्ध झाली आहे. पण मुक्ताईनगरात महाविद्यालयाच्या मालकीची शासकीय इमारत, प्रयोगशाळा, सभागृह अशी सर्व अत्यावश्यक व्यवस्था होत नाही तोर्पयत हे महाविद्यालय निमखेडी येथील तेलबिया संशोधन केंद्राच्या अखत्यारित कार्यान्वित करण्याचा विचार कृषी विद्यापीठातील वरिष्ठांचा आहे. या संशोधन केंद्रानजीक असलेल्या शासकीय कृषी विद्यालयातील काही खोल्या व सभागृह, प्रयोगशाळा महाविद्यालयास उपलब्ध केल्या जातील. तसेच प्रयोगांसाठीची जमीन तेलबिया संशोधन केंद्राकडे उपलब्ध आहे. ती जमीन महाविद्यालयाकडे येईल, असा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर समोर आल्याची माहिती मिळाली.  जामखेडचे महाविद्यालय राहुरी येथे विद्यापीठात स्थलांतरितनगर जिल्ह्याचे शासकीय कृषी महाविद्यालय जामखेड तालुक्यात सुरू केले होते. तेथेही महाविद्यालयाची इमारत व इतर सुविधांचे मुद्दे उपस्थित झाले. यामुळे कृषी विद्यापीठाने जामखेडचे महाविद्यालय राहुरी येथे विद्यापीठाच्या आवारात स्थलांतरित केले. असाच निर्णय मुक्ताईनगरच्या महाविद्यालयाबाबत घेण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत, असे कळते. स्थानिक अध्यापक अत्यल्पमुक्ताईनगर येथे कार्यरत शासकीय कृषी महाविद्यालयासाठी 101 पदे मंजूर करायची आहेत. पण अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सहयोगी प्राध्यापकांसह (अध्यापक) इतर पदांवर प्रभारी आहेत. जिल्ह्यातील किंवा स्थानिक शिक्षक फारसे नाहीत. काही प्रभारी शिक्षकांनी हे महाविद्यालय तेलबिया संशोधन केंद्रात हलविण्यासंबंधी विद्यापीठाकडे मागणी केली आहे.