शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

परिवर्तनने जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कला आणि संस्कृतीचं विश्व हे साहित्य, चित्र, संगीत, नाट्य या कलांनी समृद्ध होत असतं. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कला आणि संस्कृतीचं विश्व हे साहित्य, चित्र, संगीत, नाट्य या कलांनी समृद्ध होत असतं. परिवर्तनचे उपक्रम हे सकस व सशक्त असून जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले असल्याचे उद्गार ‘स्व.पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’च्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले आहेत.

परिवर्तन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व.पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, मंजुषा भिडे, नारायण बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्राप्त नाशिक येथील नाट्यलेखक दत्ता पाटील यांचा सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉ भालचंद्र नेमाडे व पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवाची सुरवात जगप्रसिद्ध लेखिका अमृता प्रितम व गीतकार साहिर लुधियानवी, इमरोज यांच्या प्रेमावर व जीवनावर आधारित शंभू पाटील लिखित “अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने करण्यात आली. अमृता प्रितम यांच्या लेखन प्रवासाविषयी, साहिर यांच्या गीत लेखनातील अमृता, यांच्या जीवनातील घटना व प्रेमाच्या आठवणीनी रसिकांना साहिर, अमृता व इमरोज नाटकातून अनुभवता आले. नाटकात प्रमुख भूमिका शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांनी साकारल्या तर दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे, पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर , नेपथ्य मंगेश कुलकर्णी, वेशभूषा सोनाली पाटील यांचे होते. महोत्सवात शनिवारी पुणे निर्मित जेष्ठ नाटककार रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शीत "शब्दांची रोजनिशी" हे नाटक सादर होणार आहे.