शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाने कायापालट, मात्र साधे बसस्थानक नसल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

नशिराबाद : महामार्ग चौपदरीकरण व उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले तरी महामार्गावरील नशिराबाद गावासाठी व्यवस्थित बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे मोठे ...

नशिराबाद : महामार्ग चौपदरीकरण व उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास येत असले तरी महामार्गावरील नशिराबाद गावासाठी व्यवस्थित बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. महामार्गावर एका ठिकाणी महामार्ग प्राधिकरणने छोटेसे निवारा शेड उभारून नशिराबादकरांची थट्टाच केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कार्यालयासह सर्व सुविधांयुक्त बसस्थानकाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तालुक्याचे सरचिटणीस ललित बऱ्हाटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण सुरू असून, यामुळे रस्ते मोठे होण्यासह भव्य उड्डाणपूल आकाराला येत आहे. मात्र, महामार्गावरच असलेल्या नशिराबाद गावासाठी व्यवस्थित बसस्थानक नसल्याने ग्रामस्थांसह बाहेर गावाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचेही हाल होत आहेत. येथील लोकसंख्या सुमारे ५० ते ६० हजार आहे. अनेक वर्षांपासून मध्यम तसेच लांब पल्ल्याच्या व सर्व बस नशिराबाद स्थानकात थांबून प्रवासी चढ-उतार करत होते. नशिराबाद येथून जळगाव, भुसावळ, अन्य ठिकाणी दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, महामार्गाचे चौपदरीकरण व उड्डाणपूल झाल्यापासून आता अनेक गाड्या बायपास जात आहेत. त्यामुळे बसस्थानक नावालाच राहिले आहे. सद्य:स्थितीत वाहतूक नियंत्रण कार्यालय अद्ययावत आहे. मात्र, आता महामार्गानेच सर्व बसेस वाहतूक होणार असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गावरच अद्ययावत बसस्थानक व वाहतूक नियंत्रण कार्यालय उभारून द्यावे, अशी मागणी निवेदनात ललित बऱ्हाटे यांनी केली आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गावाची लोकसंख्या बघता महामार्गालगत शासकीय, मालकीची किंवा खासगी जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तालुका दर्जाचे बसस्थानक उभारावे आणि रस्त्याचे चौपदरीकरण करीत असताना लांब पल्ल्याची वाहने उड्डाणपुलावरून बायपास जाणार नाहीत, याची दक्षता घेणे व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे प्रवासी वर्गाला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.