शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST

सुरत-अमरावती एक्सप्रेसला जनरल तिकीट देण्याची मागणी जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या सुरत-अमरावती एक्सप्रेसला आरक्षण ...

सुरत-अमरावती एक्सप्रेसला जनरल तिकीट देण्याची मागणी

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेल्या सुरत-अमरावती एक्सप्रेसला आरक्षण तिकीट असणाऱ्या प्रवाशानांच प्रवेश देण्यात येत आहे. स्थानिक प्रवाशांना व चाकरमान्यांना या गाडीचा कुठलाही उपयोग नाही. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीलाही जनरल तिकीट देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

रेल्वेतून ४० कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातील विविध विभागातील ४० रेल्वे कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात डीआरएम विवेककुमार गुप्ता या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सरव्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, लेखाधिकारी चंद्रकात कदम, एन. डी. गांगुर्डे उपस्थित होते.

स्टेशन समोरील पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी

जळगाव : रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे ही पोलीस चौकी नियमितपणे सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून ही चौकी पुन्हा बंद करण्यात आली आहे. तरी प्र‌वाशांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे.

पथदिवे सुरू करण्याची मागणी

जळगाव : जिल्हा परिषदेकडून तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पथदिवे बंद राहत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाकडून या परिसरात पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी

जळगाव : शहरातील नवीपेठेत अनेक गल्ली-बोळींमध्ये कचरा साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

पार्किंग सुरू करण्याची मागणी

जळगाव : नवीन बस स्थानकात गेल्या दोन वर्षांपासून पार्किंग बंद असल्यामुळे नागरिकांना स्थाकातच वाहने उभी करावी लागत आहेत. यामुळे बस चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी आगार प्रशासनाने स्थानकातील पार्किंग सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

गोलाणी मार्केटसमोर वाहतूक कोंडी

जळगाव :शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट समोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहनधारकांचे अतिक्रमण होत असल्यामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे . तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.

तहसीलसमोर अतिक्रमणामुळे कोंडी

जळगाव : तहसील कार्यालयासमोर दररोज दुचाकी वाहने बेशिस्तपणे उभी केली जात असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.

पंढरपूरसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोना सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनपासून जळगाव आगारातून पंढरपूरची सेवा बंद आहे. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी आगार प्रशासनाने पंढरपूरसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.