शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

रस्ता खोदून, काम बंद ठेवल्यामुळे उद्भवतेय वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही ...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही परिणाम झाला असून, काही महिन्यांपासून संथ गतीने हे काम सुरू आहे. ठिकठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी, प्रशासनाने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यानंतर, पंधरा ते वीस दिवस उलटूनही काम सुरू करण्यात येत नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे, एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे दर दहा मिनिटाला वाहतूक कोंडी उद्भवत आहे. विशेष म्हणजे सायंकाळच्या सुमारास तर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत असल्याचे परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, जमिनीत असलेल्या पाणी पुरवठ्याचे पाईप व विविध कंपन्यांच्या केबलच्या अडथळ्यामुळे हे काम रखडले असल्याची शक्यता वाहनधारकांनी व्यक्त केली.

इन्फो:

काम बंद असतानाही महामार्ग प्रशासनाने रस्ता खोदून, या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक लावला आहे. वास्तविक दिवस-रात्र या महामार्गावरून अवजड वाहनांची व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र या कामास विलंब होत असल्याने याचा सर्वाधिक त्रास वाहनधारकांना होत असून, यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

-गोकूळ पाटील, वाहनधारक

महामार्ग प्रशासनाने काम तातडीने करावे, अन्यथा काम सुरू असल्याचा बोर्ड हटवून हा रस्ता वाहतुकीला मोकळा करावा. सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत असून, पादचारी नागरिकांना तर रस्त्याच्या खालूनही चालण्यासाठी जागा राहत नाही. या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

-अनिल साळुंखे, व्यावसायिक