शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

रस्ता खोदून, काम बंद ठेवल्यामुळे उद्भवतेय वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही ...

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाचे काम सुरुवातीला युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, कोरोनामुळे या कामावरही परिणाम झाला असून, काही महिन्यांपासून संथ गतीने हे काम सुरू आहे. ठिकठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी, प्रशासनाने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवल्यानंतर, पंधरा ते वीस दिवस उलटूनही काम सुरू करण्यात येत नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी रस्ता खोदून ठेवल्यामुळे, एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे दर दहा मिनिटाला वाहतूक कोंडी उद्भवत आहे. विशेष म्हणजे सायंकाळच्या सुमारास तर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागत असल्याचे परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, जमिनीत असलेल्या पाणी पुरवठ्याचे पाईप व विविध कंपन्यांच्या केबलच्या अडथळ्यामुळे हे काम रखडले असल्याची शक्यता वाहनधारकांनी व्यक्त केली.

इन्फो:

काम बंद असतानाही महामार्ग प्रशासनाने रस्ता खोदून, या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक लावला आहे. वास्तविक दिवस-रात्र या महामार्गावरून अवजड वाहनांची व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र या कामास विलंब होत असल्याने याचा सर्वाधिक त्रास वाहनधारकांना होत असून, यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

-गोकूळ पाटील, वाहनधारक

महामार्ग प्रशासनाने काम तातडीने करावे, अन्यथा काम सुरू असल्याचा बोर्ड हटवून हा रस्ता वाहतुकीला मोकळा करावा. सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत असून, पादचारी नागरिकांना तर रस्त्याच्या खालूनही चालण्यासाठी जागा राहत नाही. या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

-अनिल साळुंखे, व्यावसायिक