शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इच्छापूरकरांनी उभारला श्रमदानातून तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 01:07 IST

150 हेक्टर जमीन सिंचनाखाली : अंतिम टप्प्यातील काम पूर्ण, परिसरातील विहिरींची जलपातळी वाढली

हरताळे/इच्छापूर: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध इच्छादेवी मंदिराच्या पूव्रेस तीन कि.मी. अंतरावर देव्हारी तलावाच्या  पाझरत्या पाण्यावर येथील ग्रामस्थांनी खालच्या पाझरणा:या पाण्यावर पुन्हा बजरंगी पाझर तलाव स्व-मेहनतीने श्रमदान करीत उभारला असून परिसरातील सुमारे 150 हेक्टरवरील जमीन सिंचनाखाली आली आह़ेतलावाच्या भरावाची रुंदी 60 फूट तर उंची 30 फूट, लांबी सुमारे 200 फूट आहे. दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीच्या माध्यमातून येथे गेल्या महिन्यापासून भराव टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आह़े  काही अंतरावर असलेल्या देव्हारी तलावाचे पाझरणारे लाखो लीटर पाणी वाया जात होते. त्यावर गावक:यांनी शक्कल लढवित स्वयंप्रेरणेने योगदान देत या पाझर तलावाची उभारणी केली आहे. त्यामुळे उभारलेल्या तलावालगतच्या  विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे. टय़ुबवेलचेही पाणी वाढल्याचा परिणाम या तलावाचा जाणवत आहे.  त्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चैतन्य निर्माण झाले आहे. या शेतक:यांनी घेतला पुढाकारगेल्या दोन वर्षापूर्वी वाया जाणा:या पाण्यासंदर्भात येथील शेतकरी तुकाराम महाराज भजनी मंडळ, ग्रामस्थ सुरेश वामन महाराज, अनिल धोंडू सपकाळ, साहेबराव कडू तायडे, नगिन बापूराव पंडित, सोपान सीताराम पंडित, श्रीराम वसंत तायडे, दादाराव रामभाऊ पंडित, सुधाकर सीताराम दाभाडे, बापू कडू पंडित, पंडित रामकृष्ण बोदडे, अरुण रमेश तांदुळलीकर, गणेश रमेश सपकाळ, दीपक कोंडे आदींनी ट्रॅक्टर, जेसीबी, डिङोलची रक्कम गोळा करून गावक:यांसह तलाव बांधला आहे. पाच वर्षापूर्वीचा तलावगेल्या पाच वर्षापूर्वी म.प्र. शासन जलधन संधान योजना भाग ब:हाणपूर अंतर्गत आमदार अर्चना चिटणीस व खासदार नंदकुमार सिंह चव्हाण यांनी सुमारे 669.24 लाख रुपये खर्चून देव्हारी तलाव बांधला होता. मात्र खाली पाझरणारे पाणी आवाक्याबाहेरचे असल्याने त्याच्याखाली दोन बांध टाकल्यानंतर देखील लाखो लीटर पाणी तापी नदीत वाहून वाया जात होते. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत बजरंग पाझर तलाव उभारला आह़े  (वार्ताहर) पाणी टंचाईवर मात दरवर्षी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. मात्र या पाझर तलावावर श्रमदानातून बांध टाकल्याने अडलेल्या पाण्यामुळे येथील पाणीटंचाई दूर होणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले.परिसरातील सुमारे 15 ते 20 विहिरीची पाणी पातळीही वाढल्याने ग्रामस्थांनी केलेल्या या स्तुत्य श्रमदानाला प्रतिसाद मिळत आहे.  इच्छा असेल तर मार्ग दिसेलचा प्रत्यय येथील शेतक:यांना आला असून श्रमदानातून तलाव बांध करणे हे एकीचे बळ असल्याचा प्रत्यय इच्छापूरकरांना आला आहे. श्रमदानातून नालाबांध मुख्य तलावाखाली दोन बांध बांधून देखील नाल्याचे पाणी वाया जाते त्याठिकाणी ग्रामस्थांनी नालाबांध टाकून श्रमदान केले आहे. म.प्र.शासन स्तरावरून येथील मुख्य तलावासाठी अनुदान मंजूर करून वाया जाणा:या पाण्याचे नियोजन व देव्हारी तलावाची पुन्हा दुरुस्ती करावी, अशी आशा व्यक्त केली जात आह़े विहिरींच्या जलपातळीत वाढ, सिंचन वाढले4श्रमदानातून उभारलेल्या बजरंगी पाझर तलावामुळे परिसरातील शेतक:यांच्या विहिरींच्या सिंचन पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय सुमारे 150 हेक्टर शेतीलादेखील त्याचा फायदा होणार असून उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आह़े