शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

जळगाव आगारातर्फे आजपासून नाशिक, कल्याण, औरंगाबादसाठी फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

जळगाव : शासनातर्फे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये ...

जळगाव : शासनातर्फे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता येण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे जळगाव आगारातून मंगळवारपासून नाशिक, कल्याण, औरंगाबादला प्रत्येकी एक फेरी सोडण्यात येणार आहे. तसेच उत्पन्नात नेहमी आघाडीवर असलेल्या काही आगारांतूनही लांब पल्ल्याच्या मार्गांवर बसेस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही तालुक्यांना बससेवा सुरू आहे. तब्बल महिनाभरापासून महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाले आहे.

मात्र, आता ३१ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता करण्यात येणार असल्यामुळे महामंडळाने टप्प्या-टप्प्याने काही गावांना बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जळगाव आगारातून नाशिक, कल्याण, औरंगाबाद, धुळे या ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. यात कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच रावेर आगारातूनही कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, भुसावळ या आगारांतून काही लांब पल्ल्याच्या गावांना बसेस सोडण्याचे महामंडळ प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील स्थानिक तालुक्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद असल्यावरच बसेसच्या फेऱ्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

...तर नियमांचे पालन करूनच बसमध्ये प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याची परवानगी दिली असून, त्यानुसार ४४ आसनी बसमध्ये प्रत्येक बाकावर एक याप्रमाणे २२ प्रवाशानांच बसमध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकाकडे मास्क असल्यासच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, सोशल डिस्टंन्सिंगचे पुरेपूर पालन करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता, आता सर्व सामान्य नागरिकानांही बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.