शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव आगारातर्फे आजपासून नाशिक, कल्याण, औरंगाबादसाठी फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

जळगाव : शासनातर्फे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये ...

जळगाव : शासनातर्फे १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी, कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काहीशी शिथिलता येण्याचे संकेत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे जळगाव आगारातून मंगळवारपासून नाशिक, कल्याण, औरंगाबादला प्रत्येकी एक फेरी सोडण्यात येणार आहे. तसेच उत्पन्नात नेहमी आघाडीवर असलेल्या काही आगारांतूनही लांब पल्ल्याच्या मार्गांवर बसेस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही तालुक्यांना बससेवा सुरू आहे. तब्बल महिनाभरापासून महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात उत्पन्न बुडाले आहे.

मात्र, आता ३१ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता करण्यात येणार असल्यामुळे महामंडळाने टप्प्या-टप्प्याने काही गावांना बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जळगाव आगारातून नाशिक, कल्याण, औरंगाबाद, धुळे या ठिकाणी बसेस सोडण्यात येणार आहेत. यात कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच रावेर आगारातूनही कल्याण येथे मुक्कामी बस सोडण्यात येणार आहे. तसेच चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, भुसावळ या आगारांतून काही लांब पल्ल्याच्या गावांना बसेस सोडण्याचे महामंडळ प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील स्थानिक तालुक्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद असल्यावरच बसेसच्या फेऱ्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

...तर नियमांचे पालन करूनच बसमध्ये प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बसमध्ये ५० टक्केच प्रवाशांना बसविण्याची परवानगी दिली असून, त्यानुसार ४४ आसनी बसमध्ये प्रत्येक बाकावर एक याप्रमाणे २२ प्रवाशानांच बसमध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकाकडे मास्क असल्यासच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, सोशल डिस्टंन्सिंगचे पुरेपूर पालन करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता, आता सर्व सामान्य नागरिकानांही बसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.