शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील धरणांच्या परिसरात होणार पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:00 IST

राज्य शासनाचा निर्णय

ठळक मुद्देतापी महामंडळाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती धरणस्थळी पर्यटनास वाव

सुशील देवकरजळगाव : राज्यात जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या सुमारे ३ हजार २५५ प्रकल्पांपैकी सह्याद्री, सातपुडा डोंगररांगातील निसर्गरम्य वातावरणातील प्रकल्पांच्या परिसरात बीओटी तत्वावर पर्यटनस्थळे व विश्रामगृह विकसित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.अभ्यासासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून १४ सप्टेंबरपर्यंत अहवाल मागविण्यात आला आहे.धोरण ठरविण्यासाठी समितीजलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरणस्थळे व विश्रामगृहे बीओटी तत्वावर खाजगी यंत्रणांकडून विकसित करणे व व्यवस्थापन करणे याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती पर्यटनक्षम असलेल्या व विकसित करता येण्याजोग्या महत्वाच्या धरणस्थळाची व विश्रामगृहांची प्राधान्यक्रमासह यादी तयार करणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत ही समिती आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.अशी आहे समितीसमितीचे अध्यक्ष म्हणून तापी पाटबंधारे विकाास महामंडळाचे कार्यकारी संचालक, सदस्य सचिव नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, तर सदस्य म्हणून मुख्य अभियंता, जलसंपदाविभाग पुणे, मुख्य अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर, अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ,ठाणे यांचा समावेश आहे.धरणस्थळी पर्यटनास वावराज्यात जलसंपदा विभागांतर्गत १३८ मोठे, २५५ मध्यम व २८६२ लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यापैकी अनेक प्रकल्प हे सह्याद्री, सातपुडा आदी डोंगररांगात व निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यामुळे जर या धरणांच्या परिसरात पर्यटनस्थळे विकसित केली तर पर्यटकांचा त्यास निश्चितच प्रतिसाद मिळेल. तसेच जलसंपदा विभार्गातर्गत १४६ विश्रामगृहे महत्वाच्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांची योग्य देखभाल होत नाही. त्यामुळे जर पर्यटनस्थळे व ही विश्रामगृहे बांधा वापरा व हस्तांतरीत करा,(बीओटी) या तत्वानुसार विकसित केल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळून प्रकल्पग्रस्त व स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. तसेच पाटबंधारे विकास महामंडळांनाही महसूल मिळू शकेल.