शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरणांच्या परिसरात होणार पर्यटनस्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:00 IST

राज्य शासनाचा निर्णय

ठळक मुद्देतापी महामंडळाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती धरणस्थळी पर्यटनास वाव

सुशील देवकरजळगाव : राज्यात जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या सुमारे ३ हजार २५५ प्रकल्पांपैकी सह्याद्री, सातपुडा डोंगररांगातील निसर्गरम्य वातावरणातील प्रकल्पांच्या परिसरात बीओटी तत्वावर पर्यटनस्थळे व विश्रामगृह विकसित करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.अभ्यासासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती नेमण्यात आली असून त्यांच्याकडून १४ सप्टेंबरपर्यंत अहवाल मागविण्यात आला आहे.धोरण ठरविण्यासाठी समितीजलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरणस्थळे व विश्रामगृहे बीओटी तत्वावर खाजगी यंत्रणांकडून विकसित करणे व व्यवस्थापन करणे याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती पर्यटनक्षम असलेल्या व विकसित करता येण्याजोग्या महत्वाच्या धरणस्थळाची व विश्रामगृहांची प्राधान्यक्रमासह यादी तयार करणार आहे. १४ सप्टेंबरपर्यंत ही समिती आपला अहवाल शासनास सादर करणार आहे.अशी आहे समितीसमितीचे अध्यक्ष म्हणून तापी पाटबंधारे विकाास महामंडळाचे कार्यकारी संचालक, सदस्य सचिव नाशिक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, तर सदस्य म्हणून मुख्य अभियंता, जलसंपदाविभाग पुणे, मुख्य अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर, अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ,ठाणे यांचा समावेश आहे.धरणस्थळी पर्यटनास वावराज्यात जलसंपदा विभागांतर्गत १३८ मोठे, २५५ मध्यम व २८६२ लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यापैकी अनेक प्रकल्प हे सह्याद्री, सातपुडा आदी डोंगररांगात व निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यामुळे जर या धरणांच्या परिसरात पर्यटनस्थळे विकसित केली तर पर्यटकांचा त्यास निश्चितच प्रतिसाद मिळेल. तसेच जलसंपदा विभार्गातर्गत १४६ विश्रामगृहे महत्वाच्या ठिकाणी आहेत. मात्र त्यांची योग्य देखभाल होत नाही. त्यामुळे जर पर्यटनस्थळे व ही विश्रामगृहे बांधा वापरा व हस्तांतरीत करा,(बीओटी) या तत्वानुसार विकसित केल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळून प्रकल्पग्रस्त व स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. तसेच पाटबंधारे विकास महामंडळांनाही महसूल मिळू शकेल.