शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

वादळ वाऱ्यासह कोसळल्या जलधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वादळ व वाऱ्यासह मंगळवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० मिनिटे जलधारा सुरू होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वादळ व वाऱ्यासह मंगळवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली. जवळपास २० मिनिटे जलधारा सुरू होत्या. त्याचवेळी सुरू असलेल्या वाऱ्यांमुळे पाऊस थांबला. सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. सोसाट्याचा वार असल्याने मुक्ताईनगर भागात रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले. या अपघातात रिक्षा चालक बालंबाल बचावला.

जून महिन्याचे पहिले पंधरा दिवस आकाशात दाटी करणाऱ्या ढगांनी फक्त पावसाची वर्दी दिली होती. मात्र धरित्रीला चिंब भिजवणारा पाऊस काही पडला नव्हता. त्यामुळे सर्वचजण आभाळाकडे डोळे लावुन बसले होते. अनेक शेतकरी पेरण्या आटोपून पाऊस कधी पडतोय, याची वाट पाहत होते. मंगळवारी दुपारी वर्दी देणारे ढग अचानक बरसु लागले. जळगावसह परिसरात दुपारी १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

रिक्षा चालक बचावला

अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनधारक व नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मुक्ताईनगर भागातील एक झाड रिक्षावर कोसळले. त्यात रिक्षा चालक शंकर एरंडे यांनी प्रसंगावधान राखत रिक्षातून बाहेर पडल्याने बचावले. रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या हाॅकर्सची मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली. पाणी व वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेकांनी वाहने थांबवित रस्त्याच्या बाजूला थांबले.

शहरात ठिकठिकाणी सखल भागात तुंबले पाणी

पावसामुळे शहरातील नेहरू चौक, गोलाणी मार्केट, नवीपेठ, पद्मालय विश्रामगृह समोर, कोर्ट चौकाकडून गणेश कॉलनीकडे जाणारा रस्ता, तसेच जिल्हा क्रीडा संकुला समोरील काही ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. यामुळे विशेषत : पादचारी नागरिकांची रस्त्यावरून चालतांना चांगलीच गैरसोय झालेली दिसून झाली.

पाऊस येताच वीज गायब

जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर शहरातील काही भागात विज पुरवठा खंडित झाला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा विज पुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र, मंगळवारी वाघनगर परिसर, रामानंद नगर, महाबळ व इतर भागात सकाळपासून विजेचा लंपडाव सुरू होता. यामुळे नागरिकांचा उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

दमदार पावसाची प्रतीक्षा

जळगाव शहरात मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी तुरळक पाऊस झालेला असली तरी परिसरातील शेताबांधांमध्ये मात्र शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील आटोपल्या आहेत. दुपारी अचानक पावसाला सुरूवात झाली. मात्र अजूनही पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत.