शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

नवीन बसस्थानकासमोर लोकसहभागातून तयार होणार स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मनपा प्रशासन, महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या पाठपुराव्यानंतर लोकसहभागातून शहरात स्वच्छतागृह तयार करण्यात येणार असून, लवकरच शहरातील नवीन बसस्थानकासमोर स्वच्छतागृह तयार केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्यासाठी वाहतूक शाखेची नाहरकत घेण्यात येणार असून, यासाठी मनपाने वाहतूक शाखेला पत्रदेखील पाठविले आहे. तसेच या जागेवरील अतिक्रमण दोन दिवसांत काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमणधारकांना दुकाने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत शहरातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणांवर सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. यात महिला वर्गाची सर्वाधिक अडचण होत असते. गेल्या काही महिन्यांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात महासभा व स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात येत होती. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनपाच्या जागेतील सुविधायुक्त स्वच्छतागृहाप्रमाणेच त्याच स्वरूपाचे महिला व पुरुषांसाठी उपयुक्त असे स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. सुप्रिम कंपनीने याआधी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर स्वच्छतागृह तयार केले असून, याठिकाणी नागरिकांची गैरसोय टळली आहे. दरम्यान, नवीन बसस्थानकासमोरील कामाला सुरुवात व्हावी या हेतूने रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी असे पत्र मनपाच्या बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाला दिले आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी वाहतूक शाखेच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तसेच दोन दिवसांत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने वाहतूक शाखेला पत्र पाठवून स्वच्छतागृह उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली आहे. वाहतूक शाखेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत भूमिपूजन होऊन स्वच्छतागृहाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.