शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नवीन बसस्थानकासमोर लोकसहभागातून तयार होणार स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मनपा प्रशासन, महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या पाठपुराव्यानंतर लोकसहभागातून शहरात स्वच्छतागृह तयार करण्यात येणार असून, लवकरच शहरातील नवीन बसस्थानकासमोर स्वच्छतागृह तयार केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्यासाठी वाहतूक शाखेची नाहरकत घेण्यात येणार असून, यासाठी मनपाने वाहतूक शाखेला पत्रदेखील पाठविले आहे. तसेच या जागेवरील अतिक्रमण दोन दिवसांत काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमणधारकांना दुकाने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत शहरातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणांवर सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. यात महिला वर्गाची सर्वाधिक अडचण होत असते. गेल्या काही महिन्यांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात महासभा व स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात येत होती. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनपाच्या जागेतील सुविधायुक्त स्वच्छतागृहाप्रमाणेच त्याच स्वरूपाचे महिला व पुरुषांसाठी उपयुक्त असे स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. सुप्रिम कंपनीने याआधी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर स्वच्छतागृह तयार केले असून, याठिकाणी नागरिकांची गैरसोय टळली आहे. दरम्यान, नवीन बसस्थानकासमोरील कामाला सुरुवात व्हावी या हेतूने रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी असे पत्र मनपाच्या बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाला दिले आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी वाहतूक शाखेच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तसेच दोन दिवसांत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने वाहतूक शाखेला पत्र पाठवून स्वच्छतागृह उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली आहे. वाहतूक शाखेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत भूमिपूजन होऊन स्वच्छतागृहाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.