शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसस्थानकासमोर लोकसहभागातून तयार होणार स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मुख्य मार्केटवगळता मुख्य रस्त्यालगत मनपाने कोठेही स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची स्वच्छतागृहांअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मनपा प्रशासन, महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व माजी स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या पाठपुराव्यानंतर लोकसहभागातून शहरात स्वच्छतागृह तयार करण्यात येणार असून, लवकरच शहरातील नवीन बसस्थानकासमोर स्वच्छतागृह तयार केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्यासाठी वाहतूक शाखेची नाहरकत घेण्यात येणार असून, यासाठी मनपाने वाहतूक शाखेला पत्रदेखील पाठविले आहे. तसेच या जागेवरील अतिक्रमण दोन दिवसांत काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी अतिक्रमणधारकांना दुकाने काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत शहरातील मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणांवर सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. यात महिला वर्गाची सर्वाधिक अडचण होत असते. गेल्या काही महिन्यांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात महासभा व स्थायी समिती सभेत चर्चा करण्यात येत होती. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत सुप्रीम कंपनीच्या माध्यमातून नवीन स्वच्छतागृह उभारण्यात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मनपाच्या जागेतील सुविधायुक्त स्वच्छतागृहाप्रमाणेच त्याच स्वरूपाचे महिला व पुरुषांसाठी उपयुक्त असे स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. सुप्रिम कंपनीने याआधी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर स्वच्छतागृह तयार केले असून, याठिकाणी नागरिकांची गैरसोय टळली आहे. दरम्यान, नवीन बसस्थानकासमोरील कामाला सुरुवात व्हावी या हेतूने रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी असे पत्र मनपाच्या बांधकाम विभागाने अतिक्रमण विभागाला दिले आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी वाहतूक शाखेच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करण्यात आली. तसेच दोन दिवसांत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेने वाहतूक शाखेला पत्र पाठवून स्वच्छतागृह उभारण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली आहे. वाहतूक शाखेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत भूमिपूजन होऊन स्वच्छतागृहाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. यामुळे जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.