शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 13:46 IST

प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे.

अतुल पेठे : ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर मांडले परखड मतजळगाव, दि. 22 - आजचा समाज हा स्थलनशील समाज आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक काळातील समाज हा नेहमीच सारखाच असतो. सांस्कृतिक आव्हान हेदेखील सारखेच असते. मात्र त्या प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या काळातदेखील संत तुकाराम, गौतम बुध्द कसे निर्माण होतील याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. परिवर्तन संस्था जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील, प्रा.शेखर सोनाळकर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते. प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हानअतुल पेठे म्हणाले की, प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान हे कायम राहिले आहे. संत ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस, संत तुकाराम या प्रत्येक संताला, राष्ट्र पुरुषाला आप-आपल्या काळात सांस्कृतिक लढाया या लढाव्या लागल्या. प्रत्येक कालखंडात एक नवीन आव्हान हे सांस्कृतिक क्षेत्रासमोर असते. संत तुकारामांनी या विरोधात आपल्या लेखनी, आपल्या अभंगातून विषमतेचा हुंकार भरत ही लढाई जिंकली. सांस्कृतिक आव्हान ङोलण्यासाठी विचार प्रवृत्ती, समृध्द विचार मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे पेठे म्हणाले. आजच्या काळाची भीती वाटतेसध्याचा काळ पाहता या काळाची भीती वाटत असल्याचे अतुल पेठे म्हणाले. आज अमेरिकेने अफगाणिस्तानवर ‘मदर बॉम्ब’ टाकला. उद्या उत्तर कोरिया ‘फादर बॉम्ब’ टाकेल. सध्या सगळे जग पेटेलेले आहे. येणा:या पिढीला आपण काय देणार आहोत? असा प्रश्न नेहमी निर्माण होतो. यामध्ये माझी जबाबदारी काय? हे ओळखणे गरजेचे आहे. कलावंतानी आप-आपल्या कलेला आयुध बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.