शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 13:46 IST

प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे.

अतुल पेठे : ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर मांडले परखड मतजळगाव, दि. 22 - आजचा समाज हा स्थलनशील समाज आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक काळातील समाज हा नेहमीच सारखाच असतो. सांस्कृतिक आव्हान हेदेखील सारखेच असते. मात्र त्या प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या काळातदेखील संत तुकाराम, गौतम बुध्द कसे निर्माण होतील याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. परिवर्तन संस्था जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील, प्रा.शेखर सोनाळकर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते. प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हानअतुल पेठे म्हणाले की, प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान हे कायम राहिले आहे. संत ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस, संत तुकाराम या प्रत्येक संताला, राष्ट्र पुरुषाला आप-आपल्या काळात सांस्कृतिक लढाया या लढाव्या लागल्या. प्रत्येक कालखंडात एक नवीन आव्हान हे सांस्कृतिक क्षेत्रासमोर असते. संत तुकारामांनी या विरोधात आपल्या लेखनी, आपल्या अभंगातून विषमतेचा हुंकार भरत ही लढाई जिंकली. सांस्कृतिक आव्हान ङोलण्यासाठी विचार प्रवृत्ती, समृध्द विचार मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे पेठे म्हणाले. आजच्या काळाची भीती वाटतेसध्याचा काळ पाहता या काळाची भीती वाटत असल्याचे अतुल पेठे म्हणाले. आज अमेरिकेने अफगाणिस्तानवर ‘मदर बॉम्ब’ टाकला. उद्या उत्तर कोरिया ‘फादर बॉम्ब’ टाकेल. सध्या सगळे जग पेटेलेले आहे. येणा:या पिढीला आपण काय देणार आहोत? असा प्रश्न नेहमी निर्माण होतो. यामध्ये माझी जबाबदारी काय? हे ओळखणे गरजेचे आहे. कलावंतानी आप-आपल्या कलेला आयुध बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.