शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जगाला आज संत तुकाराम, गौतम बुद्ध यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 13:46 IST

प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे.

अतुल पेठे : ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर मांडले परखड मतजळगाव, दि. 22 - आजचा समाज हा स्थलनशील समाज आहे, असे म्हटले जाते. प्रत्येक काळातील समाज हा नेहमीच सारखाच असतो. सांस्कृतिक आव्हान हेदेखील सारखेच असते. मात्र त्या प्रत्येक काळात संत तुकाराम, सॉक्रेटीस, गौतम बुध्द निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या काळातदेखील संत तुकाराम, गौतम बुध्द कसे निर्माण होतील याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे मत प्रसिध्द नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केले. परिवर्तन संस्था जळगाव व नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात ‘सांस्कृतिक क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील, प्रा.शेखर सोनाळकर, मंजुषा भिडे आदी उपस्थित होते. प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हानअतुल पेठे म्हणाले की, प्रत्येक काळात सांस्कृतिक आव्हान हे कायम राहिले आहे. संत ज्ञानेश्वर, सॉक्रेटीस, संत तुकाराम या प्रत्येक संताला, राष्ट्र पुरुषाला आप-आपल्या काळात सांस्कृतिक लढाया या लढाव्या लागल्या. प्रत्येक कालखंडात एक नवीन आव्हान हे सांस्कृतिक क्षेत्रासमोर असते. संत तुकारामांनी या विरोधात आपल्या लेखनी, आपल्या अभंगातून विषमतेचा हुंकार भरत ही लढाई जिंकली. सांस्कृतिक आव्हान ङोलण्यासाठी विचार प्रवृत्ती, समृध्द विचार मनात निर्माण होणे गरजेचे असल्याचे पेठे म्हणाले. आजच्या काळाची भीती वाटतेसध्याचा काळ पाहता या काळाची भीती वाटत असल्याचे अतुल पेठे म्हणाले. आज अमेरिकेने अफगाणिस्तानवर ‘मदर बॉम्ब’ टाकला. उद्या उत्तर कोरिया ‘फादर बॉम्ब’ टाकेल. सध्या सगळे जग पेटेलेले आहे. येणा:या पिढीला आपण काय देणार आहोत? असा प्रश्न नेहमी निर्माण होतो. यामध्ये माझी जबाबदारी काय? हे ओळखणे गरजेचे आहे. कलावंतानी आप-आपल्या कलेला आयुध बनवून या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.