शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

आजपासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शिक्षण मंडळाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा न घेता ऐतिहासिक निकाल लावण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नुकताच बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीने हा निकाल लावण्यात आला. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही आक्षेप आहे किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवार, ११ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ११ ते १८ ऑगस्ट अशी आहे. या तारखांदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर १९ ते २५ ऑगस्ट दरम्यानही विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना ‘विलंब शुल्क’ द्यावं लागणार आहे.

यांना देता येणार परीक्षा...

राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला. मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांनाही ही परीक्षा देता येणार आहे.

दोन संधी मिळणार

श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२१ मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची संधी या परीक्षेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, नव्याने आवेदन भरणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे सन २०२१ च्या नियमित विद्यार्थ्यांना सन २०२१ मधील पुरवणी परीक्षा व सन २०२२ मधील मुख्य परीक्षा अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.

००००००००

दहावीचा निकाल : ९९.९४ टक्के

०००००००

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : ५८,२४९

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : ३०

=======

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी : ४५,१५०

बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : २०७

०००००००

बारावीचा निकाल : ९९.५४ टक्के