शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शिक्षण मंडळाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा न घेता ऐतिहासिक निकाल लावण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार नुकताच बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष मूल्यांकन पद्धतीने हा निकाल लावण्यात आला. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही आक्षेप आहे किंवा परीक्षा देण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवार, ११ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने पुरवणी परीक्षेच्या अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ११ ते १८ ऑगस्ट अशी आहे. या तारखांदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. तर १९ ते २५ ऑगस्ट दरम्यानही विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. मात्र, यासाठी त्यांना ‘विलंब शुल्क’ द्यावं लागणार आहे.

यांना देता येणार परीक्षा...

राज्यात दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात आला. मात्र जे विद्यार्थी या पद्धतीच्या निकालाबाबत संतुष्ट नसतील अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेनुसार परीक्षा देता येणार आहे. तर पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थी यांनाही ही परीक्षा देता येणार आहे.

दोन संधी मिळणार

श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२१ मध्ये श्रेणीसुधार अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना जादाची संधी या परीक्षेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर विद्यार्थ्यांनी गतवर्षी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने फक्त अशाच विद्यार्थ्यांना वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तथापि, नव्याने आवेदन भरणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे सन २०२१ च्या नियमित विद्यार्थ्यांना सन २०२१ मधील पुरवणी परीक्षा व सन २०२२ मधील मुख्य परीक्षा अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहणार आहेत.

००००००००

दहावीचा निकाल : ९९.९४ टक्के

०००००००

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : ५८,२४९

दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : ३०

=======

बारावी उत्तीर्ण विद्यार्थी : ४५,१५०

बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी : २०७

०००००००

बारावीचा निकाल : ९९.५४ टक्के