शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात आगामी चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम राजस्थान भागात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना ब्रेक लागला आहे. तसेच कमी दाबाचा पट्टादेखील तयार होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम शुक्रवारी जिल्ह्यातील वातावरणावरदेखील झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी शहरात बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण कायम होते.

जिल्ह्यात यंदा संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. तर, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत घट येऊन चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता गेल्या १५ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला होता. तसेच उत्तरेकडून येणारे शीत वारेदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानपर्यंत जाऊन उत्तरेकडील थंड वाऱ्यांना धडकल्याने चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तापमानात चार अंशांची वाढ

शुक्रवारी शहरात दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तापमानातदेखील वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचा किमान पारा ११ अंशांवर होता. तर, शुक्रवारी शहराच्या किमान तापमानात चार अंशांची वाढ होऊन पारा १५ अंशांपर्यंत वाढला होता. कमाल तापमानातदेखील दोन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा कमी झाला होता. दरम्यान, अजून चार ते पाच दिवस वातावरण स्थिर राहण्याची शक्यता असून, २ व ३ तारखेला पावसाचा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच तापमानातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

रब्बीला फटका

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह गव्हाच्या वाढीवरदेखील परिणाम होण्याची भीती आहे. अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.