शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

पुन्हा अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली : थंड वाऱ्यांना ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका जळगावकरांनी अनुभवल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यात आगामी चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम राजस्थान भागात एक चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना ब्रेक लागला आहे. तसेच कमी दाबाचा पट्टादेखील तयार होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम शुक्रवारी जिल्ह्यातील वातावरणावरदेखील झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी शहरात बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण कायम होते.

जिल्ह्यात यंदा संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीचा कडाका वाढला होता. तर, नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीत घट येऊन चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर पुन्हा थंडीचा जोर वाढल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता गेल्या १५ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढू लागला होता. तसेच उत्तरेकडून येणारे शीत वारेदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र, पुन्हा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानपर्यंत जाऊन उत्तरेकडील थंड वाऱ्यांना धडकल्याने चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तापमानात चार अंशांची वाढ

शुक्रवारी शहरात दिवसभर अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तापमानातदेखील वाढ झाली आहे. गुरुवारी शहराचा किमान पारा ११ अंशांवर होता. तर, शुक्रवारी शहराच्या किमान तापमानात चार अंशांची वाढ होऊन पारा १५ अंशांपर्यंत वाढला होता. कमाल तापमानातदेखील दोन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे वातावरणातील गारवा कमी झाला होता. दरम्यान, अजून चार ते पाच दिवस वातावरण स्थिर राहण्याची शक्यता असून, २ व ३ तारखेला पावसाचा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच तापमानातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.

रब्बीला फटका

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासह गव्हाच्या वाढीवरदेखील परिणाम होण्याची भीती आहे. अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.