शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा तंगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST

रात्री ११.३० वाजता शेवटचे विसर्जन गणेश घाटावर सकाळी ९ वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली होती. रात्री ११.३० वाजता याठिकाणी ...

रात्री ११.३० वाजता शेवटचे विसर्जन

गणेश घाटावर सकाळी ९ वाजल्यापासून गणपती विसर्जनाला सुरूवात झाली होती. रात्री ११.३० वाजता याठिकाणी शेवटच्या बाप्पाचे विसर्जन झाले. बाप्पाच्या विसर्जनासाठी सार्वजनिक गणेश महामंडळ व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या स्वयंसवेकांची परिश्रम घेतले. तसेच ७० हजारांच्यावर घरगुती गणेश मूर्तींचे मेहरूण येथे विसर्जन झाले असल्याची माहिती सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी दिली.

पर्यावरण शाळेतर्फे ३०० मूर्तींचे संकलन

समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. विसर्जनासाठी होणारी गर्दी व त्यातून कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता यंदा गणेशभक्तांना मेहरूण तलाव व इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशास बंदी असल्यामुळे पर्यावरण शाळेतर्फे गणेशमूर्ती अर्पण आणि निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावेळी २५० - ३०० नागरिकांनीही घरापासून लांब न जाता गणेशमूर्ती आणि निर्माल्य केंद्रावर जाऊन अर्पण केले. शिव कॉलनी परिसरातील शारदाश्रम विद्यालय येथे हे संकलन केंद्र उभारण्यात आले होते.

काव्यरत्नावली चौकात २२२३ मूर्तींचे व ३ ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन

भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे रविवारी श्रीगणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी २ हजार २२३ घरगुती व सार्वजनिक श्रीगणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. यासह ३ ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले. सकाळी ७.१० वाजता पहिली मूर्ती संकलित करण्यात आली व रात्री ९.५५ वाजता शेवटची मूर्ती संकलित झाली. विशेष म्हणजे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील या ठिकाणी आपल्या घरगुती मूर्तीला केंद्रावर अर्पण केले. संकलित मूर्ती विधिवतपणे सजविलेल्या दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मेहरूण तलाव येथे नेऊन विसर्जित करण्यात आल्या. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता. यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष तिवारी, अर्जुन भारूळे, सयाजी जाधव, वेदांत दुसाने, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, विनिता पाटील, दिनेश पाटील, वैष्णवी खैरनार, यश भालशंकर, अजय चव्हाण, तृषांत तिवारी, दीक्षांत जाधव, सागर सोनवणे, जयेश पवार, भूषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, अमोल सोनवणे, भटू अग्रवाल, गोपाल पांडे, योगेश वानखेडे यांनी परिश्रम घेतले.