शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पाचोरा शहरात स्वच्छतेचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:19 IST

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : हगणदरीमुक्तीचाही बोजवारा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाचोरा : शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून हगणदारीमुक्तीचा बोजवारा झाला आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात बऱ्याच ठिकाणी कचºयाचे ढीग पहायला मिळत आहे.'स्वच्छ शहर सुंदर शहर' ही संकल्पना जाहिरातीपुरतीच सिमीत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.'स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९' कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.पाचोरा शहराची भौगोलिक स्थिती पाहता साधारण ४ कि. मी. च्या परिसरात पालिकेचे क्षेत्र आहे. १३ प्रभाग असून २६ नगरसेवक आहेत. नवीन वस्ती कॉलनी भाग झपाट्याने वाढत आहे. पालिकेतर्फे शहर स्वच्छतेचा ठेका दिला आहे. शहरात भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. मात्र आहे त्या गटारी तुडुंब भरल्या असून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग, प्लॅस्टिक, सांडपाण्याचे डबके, कोंबड्या, बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे, छाटलेले पंख, गटारीतील काढलेली घाण भर रस्त्यावर जागोजागी पडलेली आहे. मात्र नगरपालिका आरोग्य विभाग सुस्त असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास पालिका प्रशासन, सत्ताधाºयांची मानसिकता दिसून येत नाही. पाचोरा शहरात स्वच्छ केवळ नावालाच 'सर्व्हेक्षण २०१८' राबविले, लाखो रुपये जाहिराती व स्वच्छतेसाठी खर्ची घातले असतानाही शहरात घाणीचे साम्राज्यच पाहायला मिळत आहे.प्लॅस्टीक कॅरीबॅगचासर्रास होतोय वापरपर्यावरणाच्या दृष्टीने राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून ता आदेशाची पायमल्लीच होत असून एक-दोन थातुरमातुर कारवाया करून प्लॅस्टिक विक्रेत्यांवर आता हेतुपुरसार मेहेरबानी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात प्लॅस्टिकचा राजरोसपणे वापर सुरू असून प्रत्येक दुकानदार भाजी व फळ विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग उपलब्ध असून ग्राहकांना त्या दिल्या जात आहे. यामुळे शहरात कॅरीबॅगचा खच कचºयात आढळून येतो. गटारी नाले यात प्लॅस्टिक अडकलेले दिसते. मंगल कार्यालयात समारंभातही प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर होत असून यावर पालिकेचे नियंत्रण नाही.हगणदारीमुक्ती ‘फेल’शासनाने हगणदरीमुक्तीचे आदेश काढून कोट्यवधीचा निधी पालिकेला दिला. शहरात घरोघरी शौचालय मंजूर करून प्रत्येकी १५ हजाराचे अनुदान दिले. सार्वजनिक शौचालय ‘पे अँड युज’ तत्वावर १० युनिट बांधले. मात्र उघड्यावर शौच करण्याचे प्रकार थांबले नाहीत.स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेत बक्षीस मिळण्याच्या आशेने पालिकेचे गुडमॉर्निंग पथक काही दिवस चालले मात्र उपयोग झाला नाही. लोकांची मानसिकता शौचालय वापर करण्याची नसल्याचे दिसून येते. मात्र अशांवर कडक कारवाई झाली नाही. शहरातील गटारी तुडुंब भरलेल्या असून नालेसफाई होताना दिसत नाही. यामुळे गटाराचे पाणी ओहरफ्लो होऊन रस्त्यावर येते, घाणीची दुगंर्धी, गटारीतील काढलेली घाण रस्त्यावरच असते. याकडेही पालिकेचे लक्ष नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. गटारी ओसंडून वाहतात तरीही साफसफाई होत नाही.