शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शॉर्टसर्किटमुळे आग लागून करंज येथे तीन घरे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंज गावातील रहिवासी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास ...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंज गावातील रहिवासी सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या बंद घरातून सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास आगीचे लोळ निघताना गावकऱ्यांच्या लक्षात आले. घराला कुलूप लावलेले होते. शेजारी राहणारे दीपक पाटील आणि मधुकर पाटील यांच्या घरातूनही धूर निघत होता. गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करून जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटना कळविण्यात आली. अग्निशमन बंब येईपर्यंत तीनही घरांतील संसारोपयोगी वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यात सुधाकर पंढरीनाथ पाटील यांच्या घरातील सदस्यांची महत्त्वाची कागदपत्रेही जळाली आहेत. त्यांचे एकूण ४ लाख रुपयांचे नुकसान झाले, दीपक पाटील यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले, तर मधुकर पाटील यांच्या घरातील चार लाख रुपयांचे नुकसान झाले. तीनही घरातील सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सी.एस. कोळी, उपसरपंच छाया सपकाळे, पोलीस पाटील सुनील सपकाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. हिलाल पाटील, नारायण पाटील, अनिल सपकाळे, नारायण सोनवणे, भावलाल सपकाळे, पांडुरंग सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी मदत केली.