शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तीन गटांमध्ये आघाडीत बिघाडी

By admin | Updated: January 31, 2017 00:10 IST

अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायम : राष्ट्रवादीकडून तालुकास्तरावर एबी फॉर्म वाटप

जळगाव : जिल्हा परिषदेत गेली 15 वर्ष सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. मात्र पाचोरा, जळगाव ग्रामीण व चाळीसगाव तालुक्यातील तीन गटात वाटाघाटी न झाल्याने या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. तर अमळनेर व चोपडा तालुक्यातील जागा वाटपाचा तिढा संपलेला नसल्याने सोमवारी रात्री उशिरार्पयत चर्चा सुरुच होती.अमळनेर व चोपडय़ाचा तिढा कायमअमळनेर व चोपडा तालुक्यातील जागावाटपात यशस्वी तोडगा निघालेला नाही. चर्चेचे गु:हाळ सोमवारी रात्री उशिरार्पयत सुरु होते. राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेपासून मागे हटण्यास तयार नसल्याने मंगळवारी पुन्हा या दोन तालुक्यातील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे.  मात्र या तालुक्यात देखील आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.तीन गटांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समोरासमोरकाँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीसाठी आघाडी केल्यानंतर सुरुवातीच्या दोन तीन बैठकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. काँग्रेसने जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली गटासाठी आग्रह धरला. मात्र हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी तो काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. तर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर- शिंदाड गटासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय पाटील हे इच्छुक असल्याने काँग्रेसने या गटाची मागणी केली. राष्ट्रवादी देखील या गटासाठी आग्रही आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड-रांजणगाव या गटासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहे. या तिन्ही ठिकाणी सोमवार्पयत यशस्वी तोडगा न निघाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकाविरूद्ध लढणार आहेत.राष्ट्रवादीचे एबी फॉर्म रवानाराष्ट्रवादी व काँग्रेसच्या ज्या जागांवर एकमत झाले आहे त्या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या नावाचे एबी फॉर्म तालुकाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. मंगळवारी त्या-त्या उमेदवारांच्या नावाने हे एबी फॉर्म देण्यात आले आहेत. काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश काँग्रेसकडे पाठविली असून निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.पाचोरा तालुक्यातील शिंदाड गट, जळगाव तालुक्यातील शिरसोली-चिंचोली या दोन गटात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. तालुकास्तरावर आम्ही उमेदवारांचे एबी फॉर्म पाठविले आहेत.     -डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.तीन गटांमधील जागावाटपात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल. मात्र उर्वरित गट व गणांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिल.    -अॅड.संदीप पाटील,जिल्हाध्यक्ष,काँग्रेस