शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

जिल्हा प्रशासनाचा धाक संपला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:49 IST

वार्तापत्र -महसूल

जिल्हा लोकशाही दिनातील दीड वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या १३०७ तक्रारी, जलयुक्त शिवारची टप्पा चार सुरू झाला असतानाही प्रलंबित असलेली टप्पा २ ची कामे, जिल्ह्यात सुरू असलेली सर्रास अवैध वाळू वाहतूक, सातबारा संगणकीकरणाचे रखडलेले काम आदी विविध बाबींचा विचार करता जिल्हा प्रशासनाचा विविध विभागांवरील धाक संपला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.लोकशाही दिनातील तक्रारींचा निपटारा महिनाभरात करण्याचे शासन आदेश असतानाही दीड वर्षांपासून तक्रारी त्याही १३०७ प्रलंबित राहतातच कशा? असा सवाल उपस्थित होत आहे. तक्रारदार पुन्हा पुन्हा येतात, किंवा अनेक तक्रारी लोकशाही दिनाशी संबंधीत नसतातच, असे युक्तीवाद याबाबत केले जात आहेत. मात्र तसे असले तरीही त्याबाबत कारण देऊन तक्रार निकाली काढता येऊ शकते. मात्र तसे झालेले नाही. त्यावरून विविध विभागांकडून लोकशाही दिनातील तक्रारींना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे. सहकार विभागाने तर ठेवीदारांच्या विषयात केवळ वेळकाढू पणा करण्याचे धोरण अवलंबलेले दिसत आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आढावा घेण्याची मागणी ठेवीदारांकडून होत आहे.जलयुक्त शिवार योजनेच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात आता टप्पा ४ साठी गावांची नावे निश्चित करणे सुरू झालेले असताना अद्यापही टप्पा २ ची कामेच प्रलंबित आहेत. विशेषत: जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. सिमेंट बंधाºयांचीच १०-१२ कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? व त्यात पाणी कधी साठणार? असा सवाल उपस्थित होत आहे. तर कृषी विभागाची देखील एरंडोल तालुक्यातील कामे राहिली आहेत. जि.प.कडील या योजनांची अंदाजपत्रकेच चुकीच्या पद्धतीने बनविली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन मुदतीत कामे पूर्ण न केल्यास संबंधीत अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र आता जेमतेम महिनाभराचा कालावधी उरला असून जून महिन्यात पावसाला सुरूवात होईल. त्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे खरोखर शक्य होईल का?असा सवाल आहे. जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण असो की, कारवाई न करण्याचा आर्शीवाद लाभलेली वाळू वाहतूक असो, जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेच चित्र दिसून येत आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम महिना-दोन महिन्यात पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मागील वर्षीच महसूल दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांसमोर जाहीर केले होते. मात्र प्रांताधिकारी, तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा धाक संपला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.               -सुशील देवकर