शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

मुख्य सचिवांनी दिलेली मुदत संपली तरीही जळगाव जिल्ह्यात पंचनामे धीम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:53 IST

शेतकरी हवालदिल

ठळक मुद्दे सोमवारपर्यंत होणार आकडेवारी अंतीमअतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव: राज्यात राजकीय नेतेमंडळी सरकार स्थापण्याच्या घोळात अडकलेली असल्याचा लाभ प्रशासकीय यंत्रणा उचलताना दिसत असून राज्याच्या मुख्य सचिवांनी ६ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे व अपवादात्मक स्थितीत ८ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले असताना अद्यापही पंचनाम्यांचे काम धीम्यागतीने सुरूच आहे. सोमवार, ११ नोव्हेंबरपर्यंत ही आकडेवारी अंतीम ह ोण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदील झाला असून शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली़ मुख्य सचिवांनी ६ तारखेपर्यंत व जास्तीत जास्त ८ तारखेपर्यंत हे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळपर्यंत तब्बल ५ लाख ३८ हजार १२३ हेक्टरवरील म्हणजेच ८९ टक्के नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. शनिवारी उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र शनिवारी देखील हे पंचनामे पूर्ण झालेले नव्हते. हे काम सोमवार, ११ तारखेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.