शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘त्या’ बालकांची अखेर वड्री अंगणवाडीत नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी येथील एका आठ महिन्याच्या बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणा त्या पाड्यावर पोहोचली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यावल तालुक्यातील आसराबारी येथील एका आठ महिन्याच्या बालकाच्या मृत्यूनंतर यंत्रणा त्या पाड्यावर पोहोचली आहे. या पाड्यावरील दुर्लक्षित बालकांची अखेर वड्री अंगणवाडीत नोंद घेण्यात आली आहे. या ठिकाणी मिनी अंगणवाडीची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. दरम्यान, या वाढीव कुपोषित बालकांसाठी आहाराची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र हा आहार अद्यापपर्यंत आलेला नसल्याची माहिती आहे.

याबाबत चौकशी समितीने चौकशीही केली आहे; मात्र आरोग्य विभागाकडून अद्याप याचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सोपविण्यात आलेला नाही. आसराबारी येथे कुठलीच यंत्रणा पोहोचली नसल्याचे वास्तव बालकाच्या मृत्यूनंतर समोर आले होते. त्यानंतर तीन विविध पातळ्यांवर या सर्व प्रकरणाची चौकशीही करण्यात आली. यात सात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांचे खुलासेही सादर झाले; मात्र याबाबत अंतिम अहवाल आरोग्य विभागाकडेच पडून असल्याची माहिती आहे.

कर्मचारी कमतरता

आसराबारी या पाड्यावर आरोग्य शिबीर घेण्यास मनुष्यबळ कमतरतेची मोठी अडचण असल्याचे सांगितले जात आहे. यात सीएचओ तसेच आरोग्यसेवक नसल्याची माहिती आहे. यासह बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याकडेही या पदाचा प्रभारी पदभार आहे. त्यामुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती असल्याचे चित्र कायम आहे. दोन महिने उलटून अद्यापही वाढीव कुपोषित बालकांना पोषण आहार मिळाला नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

कोट

या भागात मिनी अंगणवाडीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सद्यस्थितीत वड्री अंगणवाडी अंतर्गत या बालकांची नोंद करण्यात करण्यात आली आहे. - देवेंद्र राऊत, महिला व बालकल्याण अधिकारी जि. प.