शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाला तिसरा रेल्वे मार्ग जोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

जळगाव : शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमध्ये ...

जळगाव : शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या मेगाब्लॉकमध्ये पुलाच्या अलीकडे सिग्नल रूळ टाकून, तिसरा रेल्वे मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या (अपच्या) मुख्य रेल्वे मार्गाला जोडला. मात्र, जळगाव ते शिरसोली दरम्यानच्या या तिसऱ्या रेल्वे मार्गावर विद्युत यंत्रणा व सिंगल यंत्रणेचे काम अपूर्ण असल्यामुळे, प्रत्यक्षात या मार्गावरून रेल्वे धावण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, शुक्रवारी या मेगाब्लॉकळे अप आणि डाऊन मार्गावरच्या अनेक गाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

रेल्वे प्रशासनाने १२ आणि १७ ऑगस्ट रोजी प्रत्येकी पाच तासांचा मेगाब्लॉक घेऊन मुख्य रेल्वे मार्गाला तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ जोडण्याचे काम पूर्ण केले. या कामाकरिता मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळात मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस व कामायानी एक्सप्रेस या गाड्या भुसावळ स्टेशन व सावदा स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.

तर मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेस, तुलसी एक्सप्रेस, गितांजली एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस व काशी एक्सप्रेस या गाड्या पाचोरा व शिरसोली स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या. एक ते दोन तासांपर्यंत या गाड्या विलंबाने धावल्या.

इन्फो :

५० टक्के काम अजूनही अपूर्ण

जळगाव ते शिरसोली या तिसऱ्या रेल्वे मार्गावर सध्या रूळ टाकण्याचेच काम पूर्ण झाले आहे. तर आता हा मार्ग मुख्य रेल्वे मार्गालाही जोडण्यात आला आहे. मात्र, विद्युतीकरण करणे व सिंग्नल यंत्रणा उभारण्याचे काम अपूर्ण आहे. ही कामे करायला रेल्वेला सहा महिने लागणार आहे. त्यानंतर मार्गाची चाचणी होऊन, सहा महिन्यानंतरच या मार्गावरून जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वे धावणार आहे.

इन्फो :

दोन दिवसांच्या या मेगाब्लॉक मध्ये तिसरा रेल्वे मार्ग अपच्या मुख्य मार्गाला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच आता विद्युतीकरण व सिंग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात येणार आहे.

पकंज डावरे, उप मुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग