शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भादलीतील महिला राखीव प्रवर्गातून तृतीयपंथीय अंजली पाटील विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 18:21 IST

प्रशासनाने अर्ज ठरविला होता बाद : न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मतदारराजानेही दिला विजयाचा कौल

जळगाव : सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून इतर म्हणून उमेदवारी अर्ज नाकारलेल्या व नंतर न्यायालयीन लढ्यात उमेदवारी मिळालेल्या भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांचा १७४ मतांनी पराभव केला.भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांनी महिला राखीवमधून अर्ज दाखल केला होता. यात त्यांनी ह्यलिंगह्ण प्रकारापुढे ह्यइतरह्ण असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली व त्यांना स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास परवानगी मिळाली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभागात जोमाने प्रचार केला व यात त्यांना अखेर यश मिळाले.१५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर अनेक जण विजयाचे दावे करीत होते. मात्र अंजली यांनी शांत राहत निकालाची प्रतीक्षा केली व सोमवारी सकाळी झालेल्या मतमोजणीत वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी ठरल्या. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीय लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. अंजली पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्या वेळी त्यांचा केवळ ११ मतांनी पराभव झाला होता. मात्र या वेळी त्यांनी तब्बल ५४८ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीना हरुल पटेल यांना ३७४ मते मिळाली.

जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आले. आता गावातील समस्या माझ्या जबाबदारीने मी सोडविणार असून माझ्या उमेदवारीवर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन.- अंजली पाटील, विजयी तृतीय पंथीय उमेदवार.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव