शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

पोलीस पोहोचण्याआधीच चोरटे पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

जळगाव : रामानंदनगर परिसरात संकल्प श्रीनगर कॉलनीत विद्या काशिनाथ पाटील यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ७० हजार ३०० रुपयांचा ऐवज ...

जळगाव : रामानंदनगर परिसरात संकल्प श्रीनगर कॉलनीत विद्या काशिनाथ पाटील यांच्या बंद घरातून चोरट्यांनी ७० हजार ३०० रुपयांचा ऐवज लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्री पाटील यांच्याकडे घरफोडी झाली होती. घरात चोरटे शिरल्याची माहिती मिळताच विद्या पाटील यांनी पोलिसांना घेऊन घर गाठले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

विद्या पाटील या मुलगा तेजस याच्यासोबत वास्तव्यास आहेत. त्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहेत. १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता मुलगा तेजस याची तब्येत खराब झाल्याने विद्या पाटील त्यास हॉस्पिटल येथे घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यास दाखल करून घेतले. त्यामुळे विद्या पाटील या दवाखान्यातच थांबल्या. १९ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास विद्या पाटील यांना शेजारी राहणा-या चैताली राठोड यांनी फोन करून घरात चोर घुसले व मोठ्याने आवाज येत असून तुम्ही घरी लवकर या, असे सांगितले. विद्या या लागलीच त्यांचे काका शशिकांत कोकाटे यांच्यासोबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गेल्या. तेथून कर्मचा-यांना सोबत घेऊन घरी पोहोचल्या. मात्र, तोपर्यंत चोर पळून गेले होते. घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी घरातून सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याचे कानातले तीन जोड, सोन्याची चेन, चांदीचे तीन कॉइन या दागिन्यांसह १० हजार रुपयांची रोकड असा ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेल्याचे समोर आले. २० ऑगस्ट रोजी विद्या पाटील यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तपास राजेश शिंदे करीत आहेत.