शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीची अद्याप भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी ...

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्या वादळाने उद‌्ध्वस्त केल्याने, हातातोडांशी आलेला घास मातीला मिळाला. त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी यांनी वादळग्रस्त गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

या वादळात तालुक्यातील आठशेवर शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर केळीबागा व शंभर हेक्टरवर लिंबू, मोसंबी, डाळिंब बागांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यात केळीबागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. एका-एका शेतकऱ्याचे लाखापासून ते पंधरा-वीस लाखांपर्यंत नुकसान झाले. शासकीय पंचनामे झाल्याने नुकसानभरपाई मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र दोन वर्षे होत आले तरी कवडीमात्र मदत न मिळाल्याने आपल्या तोंडाला नुसती पाने पुसली गेल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी ११ जूनला वादळाने केळीबागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. तत्कालीन पालकमंत्री,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी दौऱ्यावर आले. त्यांच्या समक्ष पंचनामे झाले. तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे. सरकार बदलले. आमदार-खासदार तेच आहेत. आमदार किशोर पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच अनेकदा केले. मात्र तालुका अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

-दीपक संभाजी महाजन, अध्यक्ष,

रा. काँ. किसान सेल, पिचर्डे, ता. भडगाव