शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीची अद्याप भरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:11 IST

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी ...

११ जून २०१९ रोजी तालुक्यातील गिरणाकाठालगत चक्रीवादळ व त्यापाठोपाठ आलेल्या पावसाने ऐन कटाईला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्या होत्या. त्यावर्षी भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी या बागा जगवल्या होत्या. त्या वादळाने उद‌्ध्वस्त केल्याने, हातातोडांशी आलेला घास मातीला मिळाला. त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी यांनी वादळग्रस्त गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी केली. महसूल व कृषी विभागाला संयुक्त पंचनाम्यांचे आदेश दिले. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

या वादळात तालुक्यातील आठशेवर शेतकऱ्यांच्या पाचशे हेक्टर केळीबागा व शंभर हेक्टरवर लिंबू, मोसंबी, डाळिंब बागांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यात केळीबागायतदारांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. एका-एका शेतकऱ्याचे लाखापासून ते पंधरा-वीस लाखांपर्यंत नुकसान झाले. शासकीय पंचनामे झाल्याने नुकसानभरपाई मिळेल, ही आशा शेतकऱ्यांना लागून होती. मात्र दोन वर्षे होत आले तरी कवडीमात्र मदत न मिळाल्याने आपल्या तोंडाला नुसती पाने पुसली गेल्याची भावना या शेतकऱ्यांमध्ये झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी ११ जूनला वादळाने केळीबागा होत्याच्या नव्हत्या झाल्या. तत्कालीन पालकमंत्री,आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, कृषी अधिकारी दौऱ्यावर आले. त्यांच्या समक्ष पंचनामे झाले. तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे. सरकार बदलले. आमदार-खासदार तेच आहेत. आमदार किशोर पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे सूतोवाच अनेकदा केले. मात्र तालुका अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहे.

-दीपक संभाजी महाजन, अध्यक्ष,

रा. काँ. किसान सेल, पिचर्डे, ता. भडगाव