शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

आंतरराष्टÑीय बाजारात कापसाला उठाव नसल्याने दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:31 IST

भाव वाढतील या अपेक्षेने केवळ ४० टक्केच विक्री

ठळक मुद्दे अद्याप शेतकऱ्यांचा घरात ६० टक्के कापूस

अजय पाटीलजळगाव : कापसाच्या भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकºयांकडून जानेवारी अर्धा संपत आल्यावर देखील कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याने, खान्देशच्या जिनींगमध्ये सध्या कापूस टंचाई जाणवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. जानेवारीपर्यंत भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारात कापसाला उठाव नसल्याने भावात वाढ न होता घट होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कापसाला शासनाकडून चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा असताना यंदा कापसाला शेतकºयांचा अपेक्षित भाव मिळू शकला नाही. सुरुवातीला भाव मिळाल्याने शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी आणलाच नाही. ज्या शेतकºयांना गरज होती. अशा शेतकºयांनी आपला माल बाजारात आणला. दरम्यान, जानेवारीमध्ये तरी कापसाच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकºयांना असताना जानेवारीत भाव न वाढता कापसाच्या दरात सारखी घटच होत आहे.८ लाख हेक्टर लागवडच्या तूलनेत केवळ ७ लाख गाठींचे उत्पादनखान्देशात यंदा ८ लाख हेक्टर जमीनीवर कापसाची लागवड झाली आहे. त्यामुळे खान्देशात सुमारे २५ लाख गाठींचे उत्पादन होणे अपेक्षित होते. मात्र, १२ जानेवारीपर्यंत खान्देशात ७ ते ८ लाख लाख गाठींचे उत्पादन आतापर्यंत झाले आहे. गेल्या वर्षी बोंडअळीची समस्या असताना देखील खरेदी चांगल्या प्रकारे होती. मात्र, यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असताना देखील कापसाला चांगला भाव मिळू शकलेला नाही.निर्यातदारांचे सौदेही थांबलेभारतीय निर्यातदारांनी जानेवारीपासून आपले सौद्यांचे करार केले होते. त्यांच्याकडील निर्यात सुरु झाली असती तर भावात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, डिसेंबरच्या आधी निर्यातदारांनी आपले सौदे केले होते. त्यावेळी डॉलरचे दर ७२ रुपये इतके होते. मात्र, आता डॉलरचे दर भारतीय रुपयाच्या तूलनेत ३ रुपयांनी कमी झाले असून सध्याचे दर ६९ रुपये इतके आहेत. त्यामुळे निर्यातदारांनी देखील आपले सौदे थांबविले आहेत. निर्यातदांचे सौदे सुरु राहिले असते तर खान्देशातील कापूस उत्पादक शेतकºयांना लाभ मिळाला असता कारण निर्यातदारांना खान्देशातील कापूस निर्यात करण्यासाठी सोईस्कर असल्याने निर्यातदारांकडून खान्देशातील कापसाला प्राधान्य दिले जात असल्याची माहिती हर्षल नारखेडे यांनी दिली.भावात घट होण्याचे कारणसंक्रांतीनंतर कापसाच्या दरात वाढ होईल असा समज शेतकºयांचा असतो. मात्र, यंदा भावात सध्या कोणतीही वाढ झालेली नाही. यामागे काही महत्वाचे कारण असून, यामध्ये भारतातील सूत मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे सूत मार्केटसाठी घेतला जाणारा कापूस सध्या घेतला जात नाही. प्रोडक्शन होत नसल्याने सूतचा स्टॉक देखील पडून आहे. त्यामुळे भावात वाढ होत नाही. अनेक जिनर्सचे पेमेंट देखील थांबविण्यात आले असून, त्यामुळे जिनर्सकडून देखील कापूस खरेदीस टाळाटाळ केली जात आहे. मात्र, ज्या शेतकºयांना पैशांची आवश्यकता आहे. असेच शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत आहेत.अमेरिका व चिनच्या ट्रेडवार मध्ये चीनकडून भारतातील कापूस खरेदी केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, चीनने भारताकडून आपला माल न घेता ब्राझीलला जास्त प्राधान्य दिले आहे. चीनने ब्राझीलकडून गेल्या वर्षाच्या तूलनेत तब्बल ३०० टक्कयांनी जास्त कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारताच्या निर्यातीवर बसत आहे.सध्याची आंतरराष्टÑीय बाजाराची स्थिती पाहता कापसाच्या दरात कुठलीही वाढ होणे सध्या तरी शक्य नाही. तसेच शेतकºयांकडून देखील अद्यापही कापूस विक्रीसाठी आणला जात नाही. आतापर्यंत खान्देशात ७ ते ८ लाख गाठींचे उत्पादन झाले असून, शेतकºयांकडे सुमारे ६० टक्के कापूस शिल्लक आहे.-हर्षल नारखेडे, संचालक, हर्षल कॉटन, आव्हाणे