शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मुक्ताईनगरातून तंटामुक्ती गाव मोहिमेसाठी दुसऱ्या वर्षीही प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:33 IST

मुक्ताईनगर तालुक्यात सुरूवातीच्या काळात उत्साह दाखविलेल्या तंटामुक्ती गाव अभियानाचा गेल्या दोन वर्षात बोजवारा उडाला असून सलग दोन वर्षापासून या मोहिमेसाठी प्रस्ताव दाखल झालेला नाही.

ठळक मुद्देआतापर्यंत ६ गावांना मिळाले आहेत पुरस्कार ६१ गावांमध्ये स्थापन आहेत तंटामुक्ती समित्या

मुक्ताईनगर, जि. जळगाव : शासन स्तरावर गांभीर्य कमी झाले की अंमलबजावणी अभावी एखाद्या लोकप्रिय व लोकाभिमुख योजना वजा उपक्रमाचा कसा बोजवारा उडतो याचे वर्तमान स्थितीत ‘महात्मा गांधी तंटामुक्ती मोहीम’ हे उत्कृष्ट उदाहरण होय. ज्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी स्पर्धा रंगायची, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभायचा आत्ता त्याच मोहिमेत सहभागी होण्यास वारंवार आवाहन करूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.गेल्या वर्षी एकही गाव या मोहिमेत सहभागी झाले नव्हते तर या वर्षी सहभागी होण्यासाठी अवघे ५ दिवस मुदत उरली असताना एकही प्रस्ताव तालुक्यातून आलेला नाही. एकंदरीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान गुंडाळले गेले तर नाहीना अशी उपहासात्मक टीका होत आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे यंदा बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु झाले आहे. सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे अपेक्षित आहे. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन झाल्याचा दावा होत आहे असे असतांना एकाही ग्रामपंचायतीने मोहिमेत सहभागी होण्याबाबत संपर्क साधला नाही किंबहुना प्रस्तावही सादर केलेला नाही. यामुळे एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या या सलोख्याच्या शासन उपक्रमाकडे पाठ फिरवली गेल्याचे चित्र आहे .२०१८- १९ या वर्षातील तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजाला १५ आॅगस्टपासून सुरूवात झाली आहे. १५ ते ३० आॅगस्टदरम्यान ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी लागणार आहे. या समितींना आपले अध्यक्ष, सदस्य बदलावयाचे असल्यास त्यांनी याच कालावधीमध्ये हा बदल करावा, अशा सूचना पोलीस विभागाने दिल्या आहे. एक तृतीयांशपेक्षा जास्त समिती सदस्य बदलू नयेत. मोहिमेमध्ये सहभाग घेतल्याबाबतचा ठराव व समितीचे अध्यक्ष, सदस्य यांचे नावाची यादी संबंधीत पोलीस स्टेशनला १ सप्टेंबरपूर्वी सादर करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी केले होते. यास तालुक्यातून अद्याप तरी प्रतिसाद लाभलेला नाही.आतापर्यंत ६ गावांना पुरस्कारतालुक्यातील हिवरा, मेंढोळदे, राजुरा धामणदे, वायला आणि भोटा या गावांना यापूर्वी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे.