शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

जळगावातील गाळे ताब्यात घेण्यास आडकाठी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:22 IST

शासनाच्या नगर विकास विभागाचे स्पष्टीकरण : मनपा केव्हाही सुरु करु शकते प्रक्रिया

ठळक मुद्देगाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीवर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंड आकारणीसाठी महासभेत ठरावमनपाच्या या ठराव क्रमांक 40 विरुद्ध व्यापा:यांनी राज्यशासनाकडे दाद मागितली होती कक्ष अधिका:यांनी मनपाला गाळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 4 -  शहरातील 18 व्यापारी संकुलांमधील गाळे रिकामे करून  ताब्यात घेण्यास मनपास शासनाकडून कोणतीही आडकाठी नाही. ही प्रक्रिया महापालिका केव्हाही सुरू करू शकते.  शासनाकडे निर्णयासाठी प्रलंबित ठरावांची माहिती विभागीय आयुक्तालयातील नगरविकास विभागामार्फत लवकरात लवकर सादर करावी अशा सूचना नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी सु.द. धोंडे यांनी मनपा प्रशासनास गुरूवारी  दिल्या. महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांमधील 2147 गाळ्यांचा करार 2012 ला संपल्यानंतर महापालिकेने मुदत संपलेल्या या  व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी तसेच गाळेधारकांकडे असलेल्या थकबाकीवर रेडिरेकनरच्या दराने पाच पट दंड आकारणीसाठी महासभेत ठराव केला होता. मनपाच्या या ठराव क्रमांक 40 विरुद्ध व्यापा:यांनी राज्यशासनाकडे दाद मागितली होती. राज्य शासनाने या ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात    चार वेगवेगळया याचिकांवर   न्या. सुबोध धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्या बेंचसमोर एकत्रित कामकाज सुरू होते. या द्विसदस्य बेंचने  14 जुलै रोजी हे गाळे दोन महिन्यात रिकामे करून घेण्याचे तसेच राज्य शासनाला मनपाच्या या प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करू नये असे आदेश दिले होते. त्यानंतर कक्ष अधिका:यांनी मनपाला गाळ्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.या ठरावांबाबत मागितली माहिती; तोर्पयत प्रक्रिया थांबवू नका गाळेकरारासंदर्भात राज्य शासनाकडे निर्णयासाठी प्रलंबित असलेले ठराव क्रमांक 40 व 135 सह विविध विषयांवर राज्य शासनाने दोन महिन्यात निर्णय घ्यावयाचे आहेत. या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी या ठरावांबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडील नगर विकास विभागामार्फत राज्य शासनाकडे तातडीने पाठवायची आहे. ठरावांची माहिती व त्या संदर्भातील प्रलंबित विषयांचे पत्र तातडीने पाठवावे अशा सूचनाही धोंडे यांनी दिल्या. ठरावांवर शासन निर्णय घेईल मात्र तोर्पयत कोणतीही प्रक्रिया थांबवू नये असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान,  केव्हाही गाळे ताब्यात घेण्याची टांगती तलवार असल्याने गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिका 18 व्यापारी संकुलांमधील गाळे केव्हाही रिकामे करून घेऊ शकते. या प्रक्रियेस शासनाकडून कोणतीही आळकाठी नाही असे  शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी   सु.द. धोंडे यांनी आज स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून या संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची माहितीही त्यांनी घेतली. 

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी सु.द. धोंडे यांनी गुरुवारी महापालिकेत संपर्क साधला. न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच महापालिकेकडून काही कागदपत्रेही मागविली आहेत. त्याबाबतची माहिती शुक्रवारी त्यांना पाठविण्यात येणार   आहे. -किशोर राजे निंबाळकर, प्रभारी आयुक्त,  मनपा

शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी धोंडे यांनी न्यायालय निर्णय, त्याची अंमलबजावणी व शासनाकडे प्रलंबित असलेल्या            विषयांची माहिती आज  घेतली. त्यांनी सूचना केल्यानुसार दोन दिवसात विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ठरावांची माहिती पाठविली जाईल.           गाळे रिकामे करून घेण्याबाबतच्या प्रक्रियेस आडकाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. -लक्ष्मीकांत कहार, उपायुक्त.