शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यरत कर्मचार्यांना मानधनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

दहा वर्षापासून प्रतीक्षा : मान मोठा धन मात्र नाही, कोविड मुळे अनुदान नसल्याचे कारण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

दहा वर्षापासून प्रतीक्षा : मान मोठा धन मात्र नाही, कोविड मुळे अनुदान नसल्याचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत महिना दीड महिना राबणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना या काळातील त्यांचे मानधनच मिळालेले नाही. गेल्या पंचवार्षीत निवडणुकीपासून या मानधनाची प्रतीक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, ते मिळालेले नाही. यंदा कोविडमुळे शासनाकडून अनुदान नसल्याची कारणे तालुकास्तरावर दिली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचातींचा निडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. यात अनेक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. दीड महिना हा पूर्ण कार्यक्रम सुरू होता. त्यात मतदान व मतमोजणीसाठीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात दिवसरात्र केंद्रांवर थांबून या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली मात्र, हक्काच्या मानधनापासून ते दोन पंचवार्षीक निवडणुका वंचित असल्याचे चित्र आहे.

४३ ग्रामपंचायतींच्या जळगाव तालुक्यात निवडणुका

७५० अधिकारी

१९० कर्मचारी

एकूण ९४० अधिकारी व कर्मचारी

अनुदानच नाही

अनेक अधिकाऱ्यांनी या मानधनाबाबत विचारणा केली असता, कोविडमुळे शासनाकडून अनुदान आलेच नसल्याचे त्यांना तहसीलदारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. दीड महिन्यातील या कामाचा मोबदला मिळावा, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहेत.

तहसीलदारांकडे मागणी

तहसीलदारांकडून या कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे मागणी केली होती. मात्र, गेल्या पंचवार्षीक प्रमाणचे यंदाही हे मानधन मिळालेच नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले..

ग्रामपंचायत निवडणुकीत दुर्लक्ष

लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे सर्वांना मानधन मिळते मात्र, शक्यतोवर ग्रामपंचायत निवडणुकांचे कोणालाच मानधन मिळत नाही, यात अधिकारी व कर्मचारी सर्वच वंचित राहत असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाचा अडसर

कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर राज्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना परवागनी देण्यात आली होती. यात जळगाव जिल्हयातील सुमारे ८००ग्रामपंचायती यात जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. निकालाच्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली होती. नंतर झालेली मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ यामागे या निवडणुकांमध्यील गर्दीलाही कारणीभूत ठरवले जात आहे. अनेक तज्ञांनी तशी मते व्यक्त केली आहे. कोरोना मुळे अनेक बाबींना बंधने आली आहे. त्यात जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पही अर्धा वर आला आहे. त्यात आता तहसीलदार यांच्या पातळीवरून अधिकाऱ्यांना मानधनासाठी कोरेानामुळे अनुदान नसल्याचे सांगितले जात आहे.