शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही बाधित मालमत्तांचे मूल्यांकन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील नागरिकांसह चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाकडून येणाऱ्या नागरिकांना सोईचा होऊ शकतो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नागरिकांसह चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागाकडून येणाऱ्या नागरिकांना सोईचा होऊ शकतो अशा पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होऊ शकलेले नाही. आधी निधीसाठी नंतर भोईटेनगरातून येणाऱ्या आर्मसाठी आणि आता आर्मसाठी बाधित होणाऱ्या मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी हे काम रखडले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात महारेलचे महाराष्ट्राचे मुख्य प्रबंधक विकास दत्ता यांनी पाहणी करून, मनपा प्रशासनाला आर्ममुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, मनपाकडून अद्यापही मूल्यांकनाचे काम सुरू झालेले नाही.

शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत. मात्र, या कामांसाठी ठरणाऱ्या अडथळ्यांबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने अनेक विकासकामांचा वेग हा अतिशय संथ आहे. यामुळे शहरात सुरू असलेली विकासकामे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना दूध फेडरेशनकडील रेल्वेगेटकडून यावे लागत आहे. मात्र, अनेकदा हे गेट बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाप्रमाणेच शहरवासीयांसाठी फायद्याचा ठरणारा पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपुलासाठी निधी मंजूर होऊन दोन वर्ष झाले असतानाही हे काम सुरू होऊ शकलेले नाही. पुलालगत आर्म असावा की नसावा यावर निर्णय घेण्यासाठी मनपा प्रशासनाने तब्बल दीड वर्षापेक्षा अधिकचा काळ खर्ची घातला. तर आता आर्मचा निर्णय झाला असताना आर्ममुळे बाधित होणाऱ्या मालमत्तांचे मूल्यांकन करून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठीही मनपा प्रशासन किती महिने खर्ची घालणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मनपा प्रशासनाने याबाबतीत तरी तत्परता दाखवून कामाला लवकर सुरुवात कशी होईल, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.