शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

By admin | Updated: April 18, 2017 00:24 IST

अमळनेर : नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी, अनधिकृत नळधारकांना दंड आकारून ते नियमित करण्याची गरज

अमळनेर : शहरात नळधारकांची संख्या प्रचंड असली तरी यातील 2200  नळजोडणी अनधिकृत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत नळजोडणीधारक शहरातील करदात्यांच्या हिश्याचे पाणी फुकटात पळवत आहेत. ही बाब नगरपरिषद प्रशासनाला माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्पयत करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात 21 हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र नगरपरिषदेची नळजोडणी फक्त 12 हजार 500 मालमत्ताधारकांनी घेतली आहे. उर्वरित मालमत्ताधारक एकतर वैयक्तिक बोअरवेलवरून पाणी घेत असावेत अन्यथा त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असावे, असा तर्क  आहे.   नगरपरिषदेतर्फे  शहरात करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार केवळ 2200 कनेक्शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा अभियंता श्यामकुमार करंजे सांगतात. त्यामुळे दरवर्षी 1800 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी भरणा:या नागरिकांच्या हिश्याचे पाणी पळवणा:या या अनधिकृत नळधारकांची जोडणी  बंद  झाली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना नगरपरिषदेने नियमित करून घेतले पाहिजे. ज्यामुळे नियमित कर अदा करणा:या करदात्यांवर अन्याय होणार नाही.नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतून 14 लक्ष रुपये भरून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मिळणारे पाणी अमूल्य आहे. त्यामुळे  नगरपरिषद प्रशासनाने फुकट पाणी घेणा:यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.अनधिकृत नळजोडणी देण्यात पालिकेतील काहींचा सहभाग असू शकतो. पालिकेचे आर्थिक नुकसान करणा:यांचाही  शोध घेणे गरजेचे आहे. जळोद येथून दररोज एक कोटी लीटर पाणी शहरात पुरवले जाते.  त्यापैकी हजारो लीटर पाण्याची गळती रोज होते. ही गळती सार्वजनिक नळ कनेक्शन आणि, सदोष पाईपलाईनमुळे होत. करदात्यांच्या रकमेतून आणलेले पाणी अशा पद्धतीने वाया जात असताना नगरपरिषद दररोज दर मानसी 100 लीटर पाणी पुरवत असल्याचे दावा  पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येतो.  आजही शहरात अनेक भागात नगरपरिषदेचे पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, पाण्याची गळती आणि अनधिकृत नळजोडणी बंद केल्यास शहराला ऐन उन्हाळ्यात ते एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकते. यासाठी पालिकेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे. जीर्ण पाईपलाईन शोधावीशहरात ज्या भागात जीर्ण पाईपलाईन झाली आहे, तीदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जीर्ण पाईपलाईनमुळेही पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होत असते.               (वार्ताहर)