शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

By admin | Updated: April 18, 2017 00:24 IST

अमळनेर : नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी, अनधिकृत नळधारकांना दंड आकारून ते नियमित करण्याची गरज

अमळनेर : शहरात नळधारकांची संख्या प्रचंड असली तरी यातील 2200  नळजोडणी अनधिकृत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत नळजोडणीधारक शहरातील करदात्यांच्या हिश्याचे पाणी फुकटात पळवत आहेत. ही बाब नगरपरिषद प्रशासनाला माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्पयत करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात 21 हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र नगरपरिषदेची नळजोडणी फक्त 12 हजार 500 मालमत्ताधारकांनी घेतली आहे. उर्वरित मालमत्ताधारक एकतर वैयक्तिक बोअरवेलवरून पाणी घेत असावेत अन्यथा त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असावे, असा तर्क  आहे.   नगरपरिषदेतर्फे  शहरात करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार केवळ 2200 कनेक्शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा अभियंता श्यामकुमार करंजे सांगतात. त्यामुळे दरवर्षी 1800 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी भरणा:या नागरिकांच्या हिश्याचे पाणी पळवणा:या या अनधिकृत नळधारकांची जोडणी  बंद  झाली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना नगरपरिषदेने नियमित करून घेतले पाहिजे. ज्यामुळे नियमित कर अदा करणा:या करदात्यांवर अन्याय होणार नाही.नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतून 14 लक्ष रुपये भरून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मिळणारे पाणी अमूल्य आहे. त्यामुळे  नगरपरिषद प्रशासनाने फुकट पाणी घेणा:यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.अनधिकृत नळजोडणी देण्यात पालिकेतील काहींचा सहभाग असू शकतो. पालिकेचे आर्थिक नुकसान करणा:यांचाही  शोध घेणे गरजेचे आहे. जळोद येथून दररोज एक कोटी लीटर पाणी शहरात पुरवले जाते.  त्यापैकी हजारो लीटर पाण्याची गळती रोज होते. ही गळती सार्वजनिक नळ कनेक्शन आणि, सदोष पाईपलाईनमुळे होत. करदात्यांच्या रकमेतून आणलेले पाणी अशा पद्धतीने वाया जात असताना नगरपरिषद दररोज दर मानसी 100 लीटर पाणी पुरवत असल्याचे दावा  पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येतो.  आजही शहरात अनेक भागात नगरपरिषदेचे पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, पाण्याची गळती आणि अनधिकृत नळजोडणी बंद केल्यास शहराला ऐन उन्हाळ्यात ते एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकते. यासाठी पालिकेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे. जीर्ण पाईपलाईन शोधावीशहरात ज्या भागात जीर्ण पाईपलाईन झाली आहे, तीदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जीर्ण पाईपलाईनमुळेही पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होत असते.               (वार्ताहर)