शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

By admin | Updated: April 18, 2017 00:24 IST

अमळनेर : नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी, अनधिकृत नळधारकांना दंड आकारून ते नियमित करण्याची गरज

अमळनेर : शहरात नळधारकांची संख्या प्रचंड असली तरी यातील 2200  नळजोडणी अनधिकृत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत नळजोडणीधारक शहरातील करदात्यांच्या हिश्याचे पाणी फुकटात पळवत आहेत. ही बाब नगरपरिषद प्रशासनाला माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्पयत करण्यात आलेली नाही. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात 21 हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र नगरपरिषदेची नळजोडणी फक्त 12 हजार 500 मालमत्ताधारकांनी घेतली आहे. उर्वरित मालमत्ताधारक एकतर वैयक्तिक बोअरवेलवरून पाणी घेत असावेत अन्यथा त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असावे, असा तर्क  आहे.   नगरपरिषदेतर्फे  शहरात करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार केवळ 2200 कनेक्शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा अभियंता श्यामकुमार करंजे सांगतात. त्यामुळे दरवर्षी 1800 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी भरणा:या नागरिकांच्या हिश्याचे पाणी पळवणा:या या अनधिकृत नळधारकांची जोडणी  बंद  झाली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना नगरपरिषदेने नियमित करून घेतले पाहिजे. ज्यामुळे नियमित कर अदा करणा:या करदात्यांवर अन्याय होणार नाही.नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतून 14 लक्ष रुपये भरून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मिळणारे पाणी अमूल्य आहे. त्यामुळे  नगरपरिषद प्रशासनाने फुकट पाणी घेणा:यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.अनधिकृत नळजोडणी देण्यात पालिकेतील काहींचा सहभाग असू शकतो. पालिकेचे आर्थिक नुकसान करणा:यांचाही  शोध घेणे गरजेचे आहे. जळोद येथून दररोज एक कोटी लीटर पाणी शहरात पुरवले जाते.  त्यापैकी हजारो लीटर पाण्याची गळती रोज होते. ही गळती सार्वजनिक नळ कनेक्शन आणि, सदोष पाईपलाईनमुळे होत. करदात्यांच्या रकमेतून आणलेले पाणी अशा पद्धतीने वाया जात असताना नगरपरिषद दररोज दर मानसी 100 लीटर पाणी पुरवत असल्याचे दावा  पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येतो.  आजही शहरात अनेक भागात नगरपरिषदेचे पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, पाण्याची गळती आणि अनधिकृत नळजोडणी बंद केल्यास शहराला ऐन उन्हाळ्यात ते एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकते. यासाठी पालिकेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे. जीर्ण पाईपलाईन शोधावीशहरात ज्या भागात जीर्ण पाईपलाईन झाली आहे, तीदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जीर्ण पाईपलाईनमुळेही पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होत असते.               (वार्ताहर)