शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

...तर जिल्ह्यातील पावणे दोन लाख वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

जळगाव : वाहनाचे पंधरा वर्षाचे आयुष्य संपले की सुस्थितीत असले तर दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी नाही तर ते वाहन ...

जळगाव : वाहनाचे पंधरा वर्षाचे आयुष्य संपले की सुस्थितीत असले तर दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी नाही तर ते वाहन स्क्रॅप करावे, अर्थात भंगारात जमा करण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात धोरण निश्चित करण्यात आले आहे. हे धोरण लागू झाले तर जळगाव जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ९९२ वाहने भंगारात जाऊ शकतात. एकूण वाहनाच्या ३० टक्के वाहनांची मुदत १५ वर्षाच्यावर झालेली आहे.

सध्याच्या नियमानुसार एखाद्या वाहनाची स्थिती चांगली असली व संबंधित वाहन मालकाच्या इच्छेनुसार पर्यावरण कराचा भरणा व फेरनोंदणी करून या वाहनाला पाच वर्षाची मुदतवाढ देता येते. नव्या धोरणानुसार पाचऐवजी फक्त दोन वर्षांचीच मुदतवाढ दिली जाणार आहे. जुन्या वाहनांमुळे अपघातांचा धोका तसेच प्रदूषण वाढत असल्याने शासनाचे हे नवीन धोरण ठरविले आहे. त्यातही मुदत कमी केल्यामुळे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू शकते, परिणामी बाजारात वाहन निर्मिती व उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. रस्त्यांच्या परिस्थितीवर वाहनांचे आयुष्य ठरत असले तरी केंद्र सरकारने भारतभर दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणले आहे. संपूर्ण देशभरात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निर्माण करण्यात आलेला आहे.

जळगाव जिल्ह्यात ५ लाख ७६ हजार ६४२ इतकी वाहनांची संख्या असून त्यात ४ लाख ७४ हजार ९१४ इतकी दुचाकींची संख्या आहे. १ लाख ७२ हजार ९९२ वाहने नव्या निर्णयानुसार भंगारात जाऊ शकतात. जे वाहन वापरण्यास योग्य नाही, ते नोंदणी अथवा इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात आले, त्याला जागेवरच स्क्रॅप केले जाते. आतापर्यंत शेकडो वाहने स्क्रॅप करण्यात आली असून त्यात सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचीच संख्या अधिक आहे.

पंधरा वर्षानंतर वाहन स्क्रॅप

एका वाहनाला पंधरा वर्षांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वाहन सुस्थितीत असेल तर पर्यावरण कर व फेरनोंदणी करून वाहनाला आणखी पाच वर्षे मुदतवाढ मिळू शकते. वाहनाची स्थिती चांगली व वापरण्यास योग्य असेल तर दर पाच वर्षांनी मुदतवाढ देता येते. परंतु, अपवादात्मक परिस्थितीत वाहने सुस्थितीत असतात. शक्यतो नवीन वाहन घेण्याकडेच किंवा अलीकडे दोन-चार वर्षे वापरलेले जुने वाहन घेण्याकडेच लोकांचा कल असतो.

कोट...

केंद्र शासनाने स्क्रॅप धोरण ठरविले असले तरी शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेले नाहीत. सरकारच्या निर्देशानुसारच परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाते. सध्या स्क्रॅपचा नियम पंधरा वर्षाचा आहे, मात्र वाहन सुस्थितीत असले तर त्याला पर्यावरण कर भरून पाच वर्षे मुदतवाढ देता येते.

-चंद्रशेखर इंगळे, आरटीओतील अधिकारी

जिल्ह्यातील खासगी वाहने : ५,३८,०४१

जिल्ह्यातील व्यावसायिक वाहने : ३८,६०१

जिल्ह्यात एकूण वाहनांची संख्या : ५,७६,६४२

दुचाकींची संख्या : ४,७४,९१४