शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील पावणे दोन लाख वाहने जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

जळगाव : वाहनाचे पंधरा वर्षाचे आयुष्य संपले की सुस्थितीत असले तर दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी नाही तर ते वाहन ...

जळगाव : वाहनाचे पंधरा वर्षाचे आयुष्य संपले की सुस्थितीत असले तर दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी नाही तर ते वाहन स्क्रॅप करावे, अर्थात भंगारात जमा करण्याबाबत केंद्रीय अर्थसंकल्पात धोरण निश्चित करण्यात आले आहे. हे धोरण लागू झाले तर जळगाव जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ९९२ वाहने भंगारात जाऊ शकतात. एकूण वाहनाच्या ३० टक्के वाहनांची मुदत १५ वर्षाच्यावर झालेली आहे.

सध्याच्या नियमानुसार एखाद्या वाहनाची स्थिती चांगली असली व संबंधित वाहन मालकाच्या इच्छेनुसार पर्यावरण कराचा भरणा व फेरनोंदणी करून या वाहनाला पाच वर्षाची मुदतवाढ देता येते. नव्या धोरणानुसार पाचऐवजी फक्त दोन वर्षांचीच मुदतवाढ दिली जाणार आहे. जुन्या वाहनांमुळे अपघातांचा धोका तसेच प्रदूषण वाढत असल्याने शासनाचे हे नवीन धोरण ठरविले आहे. त्यातही मुदत कमी केल्यामुळे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू शकते, परिणामी बाजारात वाहन निर्मिती व उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. रस्त्यांच्या परिस्थितीवर वाहनांचे आयुष्य ठरत असले तरी केंद्र सरकारने भारतभर दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणले आहे. संपूर्ण देशभरात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी सीएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निर्माण करण्यात आलेला आहे.

जळगाव जिल्ह्यात ५ लाख ७६ हजार ६४२ इतकी वाहनांची संख्या असून त्यात ४ लाख ७४ हजार ९१४ इतकी दुचाकींची संख्या आहे. १ लाख ७२ हजार ९९२ वाहने नव्या निर्णयानुसार भंगारात जाऊ शकतात. जे वाहन वापरण्यास योग्य नाही, ते नोंदणी अथवा इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात आले, त्याला जागेवरच स्क्रॅप केले जाते. आतापर्यंत शेकडो वाहने स्क्रॅप करण्यात आली असून त्यात सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचीच संख्या अधिक आहे.

पंधरा वर्षानंतर वाहन स्क्रॅप

एका वाहनाला पंधरा वर्षांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वाहन सुस्थितीत असेल तर पर्यावरण कर व फेरनोंदणी करून वाहनाला आणखी पाच वर्षे मुदतवाढ मिळू शकते. वाहनाची स्थिती चांगली व वापरण्यास योग्य असेल तर दर पाच वर्षांनी मुदतवाढ देता येते. परंतु, अपवादात्मक परिस्थितीत वाहने सुस्थितीत असतात. शक्यतो नवीन वाहन घेण्याकडेच किंवा अलीकडे दोन-चार वर्षे वापरलेले जुने वाहन घेण्याकडेच लोकांचा कल असतो.

कोट...

केंद्र शासनाने स्क्रॅप धोरण ठरविले असले तरी शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना अथवा आदेश आलेले नाहीत. सरकारच्या निर्देशानुसारच परिवहन विभागाकडून अंमलबजावणी केली जाते. सध्या स्क्रॅपचा नियम पंधरा वर्षाचा आहे, मात्र वाहन सुस्थितीत असले तर त्याला पर्यावरण कर भरून पाच वर्षे मुदतवाढ देता येते.

-चंद्रशेखर इंगळे, आरटीओतील अधिकारी

जिल्ह्यातील खासगी वाहने : ५,३८,०४१

जिल्ह्यातील व्यावसायिक वाहने : ३८,६०१

जिल्ह्यात एकूण वाहनांची संख्या : ५,७६,६४२

दुचाकींची संख्या : ४,७४,९१४