शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...तर धान्य व केळ्यांची कवडीमोल भावात करावी लागणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. रब्बीची पिके विक्रीचा काळ सुरू असताना लॉकडाऊन जाहीर झाला, तर कवडीमोल भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे एक हजार रुपयांप्रमाणे गहू व हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. तसेच केळ्यांचीही वाहतूक न झाल्यामुळे जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन जाहीर झाले तर शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी अडचणी येऊ शकतात. राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्याआधी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. तसेच गेल्या वर्षाप्रमाणे पुन्हा माल खरेदी विक्रीवर निर्बंध लावले तर शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे.

व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे आव्हान

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एकी करून धान्याचे भाव पाडण्याचे काम केले जाते. यासह जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळ्यांची वाहतूक थांबवून कमी भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो व त्याची साठवणूक करून नंतर तो माल विक्री केला जात असतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आव्हाणे येथील कृषितज्ज्ञ रवींद्र काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त केले.

कोट

जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्या योग्य असल्या तरी लॉकडाऊन जाहीर करताना शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. यासह जो बाजारभाव आहे त्या भागातच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची गरज आहे.

- डॉ. सत्वशील जाधव, प्रगतशील शेतकरी

यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल योग्य भावाने खरेदी केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

- किशोर चौधरी, शेतकरी, असोदा