शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

...तर धान्य व केळ्यांची कवडीमोल भावात करावी लागणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. रब्बीची पिके विक्रीचा काळ सुरू असताना लॉकडाऊन जाहीर झाला, तर कवडीमोल भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ येईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी देखील मार्च महिन्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे एक हजार रुपयांप्रमाणे गहू व हरभरा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. तसेच केळ्यांचीही वाहतूक न झाल्यामुळे जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन जाहीर झाले तर शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी अडचणी येऊ शकतात. राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्याआधी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. तसेच गेल्या वर्षाप्रमाणे पुन्हा माल खरेदी विक्रीवर निर्बंध लावले तर शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे.

व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे आव्हान

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात एकी करून धान्याचे भाव पाडण्याचे काम केले जाते. यासह जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळ्यांची वाहतूक थांबवून कमी भावात शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला जातो व त्याची साठवणूक करून नंतर तो माल विक्री केला जात असतो. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आव्हाणे येथील कृषितज्ज्ञ रवींद्र काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त केले.

कोट

जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्या योग्य असल्या तरी लॉकडाऊन जाहीर करताना शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. यासह जो बाजारभाव आहे त्या भागातच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची गरज आहे.

- डॉ. सत्वशील जाधव, प्रगतशील शेतकरी

यंदा अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले, तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल योग्य भावाने खरेदी केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

- किशोर चौधरी, शेतकरी, असोदा