शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

‘तेव्हा’ वाटले आता भारत भूमीचे दर्शन होणार नाही

By admin | Updated: April 2, 2017 11:33 IST

पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर आपण पुन्हा भारतात येऊन आपल्या मातृभूमीचे दर्शन होईल असे वाटले नव्हते असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.

 चंदू चव्हाण : मुलाखतीतून उलगडली ‘त्या’ रात्रीची आपबिती

जळगाव, दि.2 - भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दुस:या रात्री 12 वाजता कश्मिर मधील पुंछ सेक्टर मध्ये 11 साथीदारांसोबत गस्त वर असताना अचानक पाकिस्तान आणि भारतीय सैन्यात तुफान गोळीबार झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे बाकीचे साथीदार माङयापासून वेगळे झाले, दोन-तीन तास सारखे चालल्यानंतर काही अधिकारी समोर आले. त्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा मला कळून चुकले की आपण बॉर्डर पार करून पाकिस्तानच्या सैन्याच्या तावडीत सापडलो.त्यांच्या सैनिकांच्या हाती लागल्यावर वाटले होते, की आता मृत्यू अटळ आहे व भारतीय भूमीचे आता दर्शन कधी होणार नाही. मात्र समस्त देशवाशियांच्या प्रार्थनेमुळेच आपण पुन्हा भारताच्या भूमीत आलो असल्याची भावना चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली. 
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या वतीने शनिवारी गणपती नगरातील रोटरी भवनात खान्देशपुत्र चंदू चव्हाण यांचा सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीत चंदू चव्हाण यांनी ‘त्या’ रात्री घडलेली व पाकिस्तानच्या तावडीतील 114 दिवसांची आपबितीा सांगितली. सी.ए.अनिलकुमार शहा यांनी चंदू चव्हाण  यांची मुलाखत घेतली. यावेळी चंदू चव्हाणचे बंधू भुषण चव्हाण, रोटरी महेंद्र रायसोनी, नरेंद्र जैन, सचिल देवरे आदि उपस्थित होते. मुलाखती दरम्यान चंदू चव्हाण यांनी लहाणपणापासूनचा सर्व प्रवास यावेळी सांगितला. 
आजी-आजोबांनीच मोठे केले
चंदू चव्हाण यांनी सांगितले की, लहान असतानाच आई-वडिलांचे निधन झाले. यामुळे लहाणपणासूनच आजी-आजोबांनीच सांभाळ केला. दहावी र्पयतचे शिक्षण आत्यांकडे झाले. आठवीत असतानाच सैन्यात जायचे हे ठरवून घेतले होते. त्यातच मोठे बंधू सैन्यात भरती झाल्यानंतर त्याचापासूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. 2013 मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर अहमदनगरला प्रशिक्षण घेतले. त्यानंतर 2015 मध्ये जम्मु काश्मिर मधील सांभा सेक्टर मध्ये पोस्टींग झाली असा संपूर्ण प्रवास चंदू चव्हाण यांनी मांडला. 
अधिका:यांशी झालेला वाद हा पाकिस्तानचा बनाव
भारतीय अधिका:यांशी वाद झाला त्यामुळे रागाच्या भरात पाकिस्तानी सिमेत दाखल झालो अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा होती. भारतीय सैन्याला बदनाम करण्याचा हा  पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा हा बनाव होता अशी माहिती चंदू चव्हाण यांनी दिली. भारतीय सैन्यातील कुठल्याही अधिका:याशी कोणताही वाद झाला नसल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
सूर्य प्रकाशही पहायला मिळाला नाही
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांच्या लष्कराकडून नेहमी मारहाण केली जात असल्याचे चंदू चव्हाण यांनी सांगितले. तसेच इंजेक्शन दिले जात होते. जेवण अनेकदा मिळतच नव्हते. त्यानंतर त्यांनी कारागृहात रवानगी करून दिली. त्या कारागृहात नेहमी अंधार असायचा. सुर्यप्रकाश देखील  पहायला मिळत नव्हता. कारागृहात अनेकदा हिंदू देवतांच्या नामस्मरणाचा आवाज ऐकायला मिळायचा, त्यावरून त्या ठिकाणी इतर भारतीय असल्याचे जाणविले. कारागृहात असताना नेहमी भक्तीगीत म्हणायचो, भारतात आल्यानंतर आधीचे आठ दिवस काहीही कळले नसल्याची माहिती चंदू चव्हाण यांनी दिली.