शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

विद्यापीठ दोन कारणांसाठी महाविद्यालयातील प्रवेश रोखणार

By अमित महाबळ | Updated: June 19, 2023 18:47 IST

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी प्रवेश देणे सुरू झाले आहे.

जळगाव : पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिक्षकांची नियुक्ती करण्यासह नॅक मूल्यांकनाच्या संदर्भात आवश्यक पूर्तता जून महिन्यात करून न घेतल्यास संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखण्याची कारवाई कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करू शकते. या आशयाचे पत्र सर्वच महाविद्यालयांना बजावण्यात आले आहे.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी प्रवेश देणे सुरू झाले आहे. परंतु, काही महाविद्यालयात विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक नियुक्त नाहीत. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार नॅक संदर्भात कार्यवाही केली नसल्याचेही समोर आले होते. त्यामुळे या दोन्हींची पूर्तता जून महिन्यात करून घेण्यास महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.

विद्यापीठाशी संलग्न कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व समाजकार्य महाविद्यालयात अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अध्यापनासाठी, प्रत्येक विषयाकरिता परिनियम ४१५ (१) नुसार कमीत कमी २ शिक्षक किंवा एकूण मान्यतेच्या ५० टक्के पदे भरणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे. ही नियुक्ती न केल्यास महाविद्यालयांना पदव्युत्तर विषयाच्या कोणत्याही विषयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाहीत. विद्यापीठाने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.

ज्या महाविद्यालयांनी आयआयक्यूए रिपोर्ट (इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन फॉर क्वॉलिटी असेसमेंट) नॅक कार्यालयाला सादर केलेला नाही आणि ज्यांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, मानांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे त्यांना कळविण्यात आले आहे. यानंतर महाविद्यालयांनी आयआयक्यूए सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जून महिन्याच्या मुदतीनंतर शिक्षक नियुक्ती व नॅक अनुषंगाने पूर्तता न केलेल्या महाविद्यालयांवर पुढील कारवाईचा निर्णय विद्यापीठाची समिती घेणार आहे.

समितीच्या निर्णयानुसार कारवाई

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परिनियम ४१५ (१) नुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यासह नॅकच्या अनुषंगाने आवश्यक त्या पूर्तता करून घेण्यास महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. त्यासाठी जून महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यापीठाची समिती पुढील कारवाईचा जो निर्णय घेईल तो संबंधित महाविद्यालयांना लागू होईल. विहित मुदतीत शिक्षकांची नियुक्ती व नॅक संदर्भात पूर्तता न केल्यास विद्यापीठाच्या पूर्व परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नयेत, असे महाविद्यालयांना कळविले आहे, अशी माहिती कबचौउमविचे  प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी दिली.